"NRC शिवाय आसाममध्ये एकही घुसखोर आला तर राजीनामा देईन"; मुख्यमंत्री सरमा यांचे आश्वासन

    12-Mar-2024
Total Views | 36
 SARMA
 
दिसपूर : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) संदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, एनआरसीसाठी अर्ज न करता, एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळाले तर ते राजीनामा देणारे पहिले व्यक्ती असतील. वास्तविक, देशात सीएए लागू झाला आहे. त्याचवेळी आसाममध्ये याला विरोध होत आहे. आंदोलकांच्यामते, यामुळे बाहेरच्या लोकांचा राज्यात पूर येईल.
 
मुख्यमंत्री सरमा यांनी शिवसागर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना आंदोलकांना एनआरसी संदर्भात मोठे आश्वासन दिले. ते म्हणाले की, “मी आसामचा मुलगा आहे. एनआरसीसाठी अर्ज न केलेल्या एका व्यक्तीलाही नागरिकत्व मिळाले तर मी राजीनामा देणारा पहिला व्यक्ती असेन. खरं तर, आंदोलकांचा दावा आहे की सीएए लागू झाल्यास लाखो लोक राज्यात प्रवेश करतील.
 
 
सरमा म्हणाले की, "असे झाले तर मी सर्वप्रथम आंदोलन करेन." ते म्हणाले की सीएएमध्ये काही नवीन नाही कारण ते आधी लागू केले गेले होते आणि आता पोर्टलवर अर्ज करण्याची वेळ आली आहे. पुढे बोलताना सरमा म्हणाले की, “सीएएचे समर्थन करणारे देखील आसाममध्ये आहेत आणि जे समर्थन करत नाहीत ते देखील येथे आहेत. सीएएला विरोध करणारे न्यायालयात जाऊ शकतात. राज्यात शांतता राखणे हा आमचा उद्देश आहे. मी सर्वांना या दिशेने पुढे जाण्याचे आवाहन करू इच्छितो.”
 
मोदी सरकारने सोमवारी, दि. ११ मार्च २०२४ रोजी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली. यानंतर आसाममध्ये अनेक संघटनांनी विरोध सुरू केला आहे. ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (एएसयू) आणि ३० संघटनांनी सोमवारी गुवाहाटी, बारपेटा, लखीमपूर, नलबारी, दिब्रुगड आणि तेजपूरसह राज्यातील विविध भागांमध्ये सीएए कायद्याच्या प्रती जाळल्या.
 
नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार (CAA), दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात येणाऱ्या गैर-मुस्लिम - हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना आवश्यक आहे. यापूर्वी, भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षे राहणे आवश्यक होते. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ अंतर्गत हा नियम सुलभ करण्यात आला आहे. नागरिकत्व मिळविण्याचा कालावधी ११ वरून ६ वर्षे करण्यात आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121