मुंबई, दि.२८ : प्रतिनिधी भारतीय व्यवस्थापन संस्था, बंगळुरूने स्मार्ट शहरे मोहिमेच्या समीक्षा शृंखलेअंतर्गत दोन अध्ययन हाती घेतली होती. या अध्ययनात, स्मार्ट क्लासरूम्सच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे आणि भारतीय स्मार्ट शहरांमध्ये गुन्ह्यांच्या घटनेत रिअल टाइम ट्रॅकिंग ठेवले जात असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामुळे शहरांमधील महिलांचा सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा विश्वास वाढल्याचे यातून आढळून आले आहे.
नोव्हेंबर २०२३मध्ये सुरू झालेल्या, स्मार्ट शहरे आणि कृती व संशोधनाच्या दिशेने शिक्षण क्षेत्र स्मार्ट शहरे मोहिमेत देशाच्या २९ प्रमुख संस्थांद्वारे विविध विषयांवर भारतीय स्मार्ट शहरांवर ५० राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव मूल्यांकन अध्ययन केले गेले. यामध्ये बंगळुरूच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेने, भारतीय स्मार्ट शहरांमध्ये मुलांसाठी, विशेषत: गरीब मुलांसाठी, स्मार्ट क्लासरूम च्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे का, जसे की गळतीचे प्रमाण कमी होणे, याविषयीचे अध्ययन हाती घेतले होते.राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ७१ शहरांत २,३९८ सरकारी शाळांमध्ये ९,४३३ स्मार्ट क्लासरूम विकसित केल्या आहेत. वर्ष २०१५-१६ ते २०२३-२४ या कालावधीत १९ शहरांनी नोंदवलेल्या डेटानुसार स्मार्ट शहरे मोहिमेद्वारे स्मार्ट क्लासरूम सुरू केल्यामुळे एकूण नोंदणीत २२% वाढ झाली आहे.
या मालिकेत ‘भारतातील स्मार्ट शहरांमध्ये गुन्हेगारी विशेषतः महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांच्या वास्तव-वेळी ट्रॅकिंगचा प्रभाव कसा आहे?’ या विषयावरील अभ्यास आयआयएम, बंगळुरू हाती घेतला. या अभ्यासात घटनांच्या वास्तव-वेळी ट्रॅकिंगसह शहरातील महिला आणि मुलींची सुरक्षा, नजर ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, सीसीटिव्ही कॅमेरे, आयओटी-चलित उपकरणे आणि नियंत्रण केंद्रांसह (आयसीसीसीज्) एकात्मिकरण यांच्या प्रभावाच्या मूल्यांकनाचा समावेश आहे. ९३ स्मार्ट शहरांमध्ये ५९,८०२पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेरे आणि आणिबाणीच्या प्रसंगी वापरासाठी कॉल बॉक्स बसविण्यात आले आहेत. आयसीसीसीज् मार्फत वास्तव-वेळी नियमन यंत्रणेमुळे शहरी भागात महिलांची सुरक्षा वाढविण्यास हातभार लागला आहे. देखरेख यंत्रणांना पोलिसांच्या व्यवस्थेशी जोडून घेतल्यामुळे देशात पुरावा-आधारित पाळत ठेवणे शक्य झाले आहे. नागपूरमध्ये देखरेखीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर एकंदर गुन्हेगारीच्या प्रमाणात १४% घट नोंदविण्यात आली. या तीन शहरांमधील महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा विश्वास वाढल्याचे सांगितले.