पटना (BPSC Protest): बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थींकडून केली जात आहे. गर्दनीबाग येथे विद्यार्थींचे आंदोलन सुरू आहे. १३ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आंदोलनात आता लोकप्रिय शिक्षक खान सर सुद्धा सामील झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थींना संबोधन करताना खान सर म्हणाले की " आमची फक्त एकच मागणी आहे आणि ती म्हणजे रीएक्झाम! आज इथे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाहीये" असे म्हणत त्यांनी बीपीएससीवर निशाणा साधला.
१३ डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त स्पर्धा परीक्षेत बिहाराची राजधानी पटणा इथल्या बापू भवन परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरली होती, त्यानंतर शेकडो उमेदवारांनी आपला निषेध नोंदवण्यासाठी परीक्षेवर बहिष्कार टाकला होता. परंतु काही समाजंकटकांनी ही अफवा पसरवल्याचा दावा बीपीएससीने केला आहे. खान सर या संर्दभात माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही फक्त रीएक्झाम घेण्यात यावी अशी मागणी करत आहोत. आयोगाला जितका कठीण पेपर काढावासा वाटतोय, तो त्यांनी काढावा, आम्ही त्यापासून पळ काढत नाही. परंतु आयोगाने या संदर्भातील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज का लपवले हे आम्हाला जाणून घ्यायाचे आहे. पेपर फुटीसंदर्भात तपासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. याबद्दलचे सत्य बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ. बिहारमध्ये काय चाललयं हे आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर घालू असं खान सर म्हणाले.