मनसुख हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होते?
31-Oct-2024
Total Views | 115
मुंबई : मनसुख हिरेनची (Mansukh Hiren) झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळेच स्पष्ट होईल, अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सांगितले, की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडले. आता माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे , मनसूख हिरेनची हत्या होणार, हे त्यांना माहिती होते की नव्हते? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसूख हिरेनला गायब करण्यात आले असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचे समजले", याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.