मनसुख हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होते?

    31-Oct-2024
Total Views | 115
 
Mansukh Hiren
 
मुंबई : मनसुख हिरेनची (Mansukh Hiren) झालेल्या हत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह, सचिन वाझे हे एकच असल्याचे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केले. तसेच १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणात आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. याचपार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता फडणवीसांनी जशास तसं उत्तर दिले आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जर तुम्ही न्यायालायाचा निर्णय वाचला, तर त्यात सगळेच स्पष्ट होईल, अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे आयुक्त होते. त्याची दखल मुख्य न्यायाधीशांनी घेतली. त्यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात सांगितले, की पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. हे सगळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये घडले. आता माझा अनिल देशमुखांना एकच प्रश्न आहे , मनसूख हिरेनची हत्या होणार, हे त्यांना माहिती होते की नव्हते? मी सदनात याची माहिती दिली होती. मनसूख हिरेनला गायब करण्यात आले असून त्याची हत्या होऊ शकते, असा संशय मी व्यक्त केला होता. त्यानंतर त्याची हत्या झाल्याचे समजले", याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121