मुबंई : भारताची बँडमिंटनपटू सानिया मिर्झाची बहीणी अनम मिर्झाने सोशल मीडीयावर पोस्ट करत UPI अॅप्स वापरण्याविरुद्धचा सल्ला आपल्या फॉलोवरना दिला आहे. अनमने इंस्टाग्रामवर असा खुलासा केला आहे की, तिने गुगल पेसह UPI अॅप्स वापरणे बंद केले आहे. अनमने पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती म्हणते की, "यावर्षी पासून मी गुगल पे वापरणे बंद केले, मी माझे यूपीआय अकाउंट रिकामी करून, माझ्या फोनमधील सर्व यूपीआय अॅप्स मी डिलीट केले आहेत." यातून अनमच्या मते, ती तीच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अधिक सक्षम झाली आहे.
"यूपीआय अॅप्स मी डिलीट केल्यांनतर सुरवातीचे काही दिवस हे माझ्यासाठी कठीण होते. परंतू आता त्याची सवय झाल्याचे तिचे म्हणणे आहे. अनम म्हणाली की,UPIअॅप्स मी डिलीट केल्याने माझे पैसे कुठे जात आहेत याची अधिक जाणीव मला होत आहे. ज्याने माझी अधिक बचतसुद्धा होत आहे." असे अनम म्हणाली.
भारतात 'यूपीआय'च्या माध्यमातून किती कोटींचे व्यवहार?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) नुसार, मे २०२५ पर्यंत भारतातील जवळपास ६७३ बँका यूपीआयवर सक्रिय आहेत. जिथून २५ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे व्यवहार 'यूपीआय'च्या माध्यमातून केले जातात. यूपीआय इकोसिस्टममध्ये भारतात प्रति मिनिट सुमारे ५,००० यूपीआय व्यवहारांसह एसबीआय बँक ही आघाडीवर आहे. तर प्रति मिनिट १,५०० यूपीआय व्यवहारांसह एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे.