अलिबाग येथील नागाव व चौल येथे २४ तासात दिल्या अकरा नवीन वीज जोडणी

    18-Aug-2023
Total Views | 104

Mahavitaran


मुंबई :
नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना शहरी भागात २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्याची महावितरणची मोहीम राज्यभर सुरु आहे. नव्या वीज जोडणीसाठीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व परिमंडलांना दिले होते.
 
मुख्य अभियंता श्री.सुनिल काकडे या कामाबाबत प्रत्येक मंडळाचा दररोज आढावा घेत आहेत. त्यानुसार, महावितरण अलिबाग येथील नागाव शाखेत ११ अर्जदारांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासांच्या आत वीज जोडण्या देण्यात आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी नवीन वीज जोडणीच्या कामाला वेग देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे, वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी २४ तासाच्या आत वीज जोडणी देण्याचे प्रयत्न कर्मचारी करत आहेत.
 
ग्राहकाने अर्ज केल्यानंतर महावितरणचे कर्मचारी जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. कागद पत्रांची पडताळणी करून त्यांच्याकडून आवश्यक शुल्क भरून घेतल्यानंतर काही तासातच ११ नवीन वीज जोडणी देण्याचे उपक्रम महावितरणच्या भांडूप परिमंडलातील नागाव शाखेने केले आहे.
 
महावितरणच्या नागाव व चौल भागात दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी नवीन वीज जोडणीसाठी एकूण ११ नवीन अर्ज प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता, अलिबाग श्री. शैलेश कुमार व अति. कार्यकारी अभियंता अलिबाग उपविभाग १ श्री.प्रशांत बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २४ तासाच्या आत ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या. याबाबत, अधीक्षक अभियंता पेण श्री.इब्राहीम मुलाणी यांनी त्यांचे कौतुक केले. अर्ज केल्यानंतर तातडीने वीज जोडणी मिळाल्याबद्दल ग्राहकांनी महावितरणच्या नागाव शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


अग्रलेख
जरुर वाचा
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार कसे सुरू आहे मिशन खड्डेमुक्त मुंबई?

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील २२७ वार्डांमध्ये एकेक “ डेप्युटी अभियंता” नियोजित करून नविन उपक्रम राबविला आहे. प्रत्येक अभियंता त्याच्या वार्डात १० ते १५ किमीचा रस्ता रात्री-रोज तपासतो. दर दोन दिवसांनी दुचाकीवरून किंवा पायी जाउन रस्ता तपासला जातो. यामुळे खड्यांची वेळेवर ओळख होईल आणि त्वरित भरपाई केली जाईल . पहिली सभा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रोड्स आणि ट्रान्सपोर्ट विभागाशी ९ जून रोजी घेतली. यात त्यांनी निर्देश दिले खड्डे ६ ते १२ इंच रुंद असताना भरली पाहिजेत. मोठे खड्डे कामात ..

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121