नाशिक : संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्यांच्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपसंचालक ‘आरोग्य सेवा नाशिक मंडळ’ डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या नियोजनानुसार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक लोणे, डॉ. युवराज देवरे यांनी पालखी मार्गावर आरोग्य विभागामार्फत सेवा पुरविण्याबाबत तयारी पूर्ण कली आहे.
वारकर्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून पालखी मार्गावर आरोग्य उपचार केंद्र तयार करण्यात आले आहे. तसेच, दोन रुग्णवाहिका, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वारंवार पाणी तपासणीसाठी आरोग्य दूतांची नियुक्ती, पालखी मार्गावर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी धूर फवारणी तसेच स्वच्छता, जागोजागी वैद्यकीय सेवेबाबत अधिकार्यांचे नाव व संपर्क नंबरचे बॅनर, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा साठा, ‘ईसीजी’ तपासणी, आरोग्य शिक्षण तसेच, आरोग्य दूत म्हणून आरोग्य कर्मचार्यांना विशिष्ट गणवेशात नियुक्त करण्यात आलेले आहे. तसेच, जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी पालखी मार्गावर नियुक्त करण्यात आले आहे.