पाणबुडी प्रकल्पावरून नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, "आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे..."

    31-Dec-2023
Total Views | 70

Nitesh Rane & Aditya Thackeray


मुंबई :
गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरु झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "काही दिवसांपासून सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाच्या बाबतीत उलटसुलट बातम्या येत आहेत. कुठलीही माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी भुंकण्याचं काम विरोधक करत आहे. सिंधुदुर्ग प्रकल्प गुजरातला जाणार नाही. पण महाराष्ट्रात असलेल्या पाणबुडी प्रकल्पासारखाच एक प्रकल्प गुजरात आणि केरळमध्येदेखील होणार आहे. त्यामुळे कुणीही आपला प्रकल्प पळवलेला नाही."

 
ते पुढे म्हणाले की, "२०१८ च्या जवळपास दीपक केसरकर यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. परंतू, महाविकास आघाडी सरकारच्या काळात असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी याला कुठलीही चालना दिली नाही. हा प्रकल्प बंद कसा पडेल यावर त्यांनी जास्त जोर दिला. त्यामुळेच आज गुजरात आणि केरळमध्ये हा प्रकल्प सुरु झाला पण आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात अजून जैसे थे च आहे. तरीही आमचं महायुती सरकार हा पाणबुडी प्रकल्प पुर्ण करेल आणि देशात एक आदर्श प्रकल्प म्हणून नाव कमवेल," अशी ग्वाही नितेश राणेंनी दिली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121