‘एआय’चा जबाबदार वापर होणे गरजेचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आभासी जी२० शिखर परिषदेत प्रतिपादन

    22-Nov-2023
Total Views | 53
Narendra Modi on Artificial Intelligence

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे. त्यामुळे एआयच्या जागतिक नियमनावर एकत्र काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी जी२० शिखर परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांनी विद्यमान जागतिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, एआयच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करण्याची गरज आहे. एआयच्या नकारात्मक वापराबद्दल जगभरातील चिंता वाढत आहे. एआयच्या जागतिक नियमनावर एकत्रितपणे काम केले पाहिजे, अशी भारताची भूमिका आहे. डीपफेकचे गांभीर्य समजून घेऊन ते समाजासाठी आणि व्यक्तीसाठी किती धोकादायक आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. या दृष्टीकोनातून भारतात पुढील महिन्यात ग्लोबल एआय पार्टनरशिप समिट आयोजित केला असून यामध्ये जागतिक एकमत घडविण्यासाठी भारत सज्ज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पश्चिम आशिया क्षेत्रातील असुरक्षितता आणि अस्थिरतेची परिस्थिती जागतिक चिंतेचा विषय असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दहशतवाद हा सर्व जी२० सदस्यांना मान्य नाही. निरपराध नागरिकांचे होणारे मृत्यू निषेधार्ह आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला कोणतेही प्रादेशिक स्वरूप येणार नाही याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्याचवेळी आज ओलिसांची सुटका झाल्याचे वृत्त आशादायी असून लवकरच सर्व ओलिसांची सुटका होईल. त्यामुळे मानवतावादी मदत वेळेवर पोहोचविणे आणि त्याचे निरंतर वितरण आवश्यक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121