डाव्यांच्या उधळपट्टीमुळेच केरळ आर्थिक संकटात; केंद्रीय मंत्र्यांचा टोला

    13-Nov-2023
Total Views | 56
Union Minister V. Muralidharan On Kerala Economical Condition

नवी दिल्ली :
केरळच्या डाव्या आघाडीच्या सरकारची उधळपट्टी आणि चैन यामुळेच राज्यावर आर्थिक संकट आले आहे, असा टोला केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लगाविला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी केरळमधील पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केरळ राज्यावर आलेल्या आर्थिक संकटास केंद्र नव्हे तर राज्य सरकारचा कारभार जबाबदार आहे.

केरळच्या आर्थिक संकटासाठी केंद्र सरकारच्या धोरणांपेक्षा सत्तारूढ डाव्या आघाडी सरकारची चैन आणि उधळपट्टी कारणीभूत आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. कारण, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे दरवेळी केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या निधीविषयी वेगवेगळे आकडे सांगत असतात. त्यामुळे सत्तारूढ डाव्. आघाडीने प्रथम आपल्या कारभाराकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिला आहे.

राज्याचे अर्थमंत्री बालगोपाल यांनी कोल्लम येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र आर्थिक बाबतीत राजस्थान आणि छत्तीसगडसह विरोधी शासित राज्यांशी अत्यंत भेदभावपूर्ण वागणूक देत आहे. त्यापैकी केरळला सर्वाधिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे, असाही आरोप केरळ सरकारतर्फे करण्यात आला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121