दोडामार्गमध्ये विद्युत कुंपणामुळे गव्याचा मृत्यू

    11-Aug-2022
Total Views | 93

Gava
 


मुंबई:
दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गवा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपीला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
 
वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने  हा मृत्यू मंगळवार 9 ऑगस्ट रोजी झाल्याचा अहवाल दिला.पण तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू मंगळवारी दि. ८ ऑगस्ट रोजी झाल्याचे सांगितले.



पण तुर्ली येथील सुनील गवस यांनी आपल्या शेतात गवा रेडा मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागाला दिली होती. परंतु ही माहिती चुकीची असल्याचे समोर आल्यावर, पुढील चौकशी करण्यात आली. तेव्हा तक्रारदारानेच हा मृत्यू घडवून आणल्याचे समोर आले. वनविभागाने तत्काळ त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली. शॉक देण्यासाठी वापरलेली तार व आकडा जप्त करण्यात आले आहे.
 
 gavha 
 

या कारवाई दरम्यान प्रभारी उपवनसंरक्षक वर्षा खरमाटे, प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी मदन क्षिरसागर, खडपडे वनपाल रत्नराज गायकवाड कोनाळ वनपाल शिवराम शिरवलकर, वनरक्षक समाधान कोल्हे, रामराव मुकाडे, गणेश भोसले, भास्कर डोंगरे व वनमजुर हे उपस्थित होते.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121