जो निर्णय कधीही झाला नसता, तो मोदी सरकारने घेतला!

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

    18-Dec-2022
Total Views | 75
Manoj Sinha



मुंबई
: महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शनिवार, दि. १८ डिसेंबर रोजी ‘बदलता जम्मू-काश्मीर, नये कदम नयी तस्वीर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. मनोज कोटक, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, आ. कालिदास कोलंबकर आणि आ. तमील सेल्वम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या प्रगतीवर भाष्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीचे पूजन करून प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी यावेळी आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले की, “जो निर्णय कधी घेतला जाईल असे वाटले नव्हते तो निर्णय आत्ताच्या सरकारने घेतला. ज्या पुलवामाची ओळख दहशतवाद म्हणून होती तिथे दहा हजार तरुणांनी तिरंगा फेरीत भाग घेत ‘भारत माता की जय’ असे नारे दिले.”


महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “सरदार पटेल यांनी काश्मीरला जोडण्याचे जे काम सुरू केले होते ते आता पूर्ण करण्यात मनोज सिन्हा यांचा वाटा आहे. शिक्षण, हॉटेल, अशा अनेक क्षेत्रातील कंपन्या आज मनोज सिन्हा यांच्यामुळे काश्मीरमध्ये जात आहेत. आज जी प्रगती जम्मू-काश्मीरमध्ये होत आहे ती मनोज सिन्हा यांच्यामुळे होत आहे, काश्मीर त्यांना कधीच विसरणार नाही.”भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे म्हणाले की, “ ‘कलम ३७०’, ‘३५ अ’ यांसारख्या कलमांमध्ये परिवर्तन झाले ते म्हणजे मोदी सरकारमुळे. जम्मू आणि काश्मीरमध्ये होणार्‍या प्रगतीमध्ये मनोज सिन्हा यांचा हात आहे, हे आपण कधीच विसरू शकणार नाही.”
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाच-सहा कुटुंबांना गाव सोडावे लागले. त्यातल्या एका कुटुंबाने माझी भेट घेतली आणि सांगितले की, आमची मुलगी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार होती, पण आता ते शक्य नाही. पण, मग त्या मुलीचे अ‍ॅडमिशन पुण्यातील विद्यापीठात करून देण्यात आले. मात्र, अगदी सहजतेने तेथील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जे काम तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते ते आता जर कोणी करत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. मनोज सिन्हा हे बनारसच्या विद्यापीठातील ‘एमटेक’चे विद्यार्थी राहिले आहेत. कोणतेही काम सुंदरतेने कसे करावे हे जर कोणाला शिकायचे असेल, तर ते मनोज सिन्हा यांच्याकडून शिकावे. मुंबईची सर्व टीम जम्मू-काश्मीर बघण्यासाठी येणार आहोत. जम्मू-काश्मीरमधून जे बाहेर गेले आहेत त्यांचीदेखील पुन्हा आपल्या प्रदेशात जाऊन काम करण्याची इच्छा आहे. मनोज सिन्हा यांनी पुढेही असच काम करत राहावे.”





अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121