उल्हासनगर महापालिकेने न झालेल्या रस्त्याचे बिल ठेकेदाराला अदा केले

महानगरपालिका विरुद्ध स्थानिकांचे आमरण उपोषण

    28-May-2025
Total Views |
उल्हासनगर महापालिकेने न झालेल्या रस्त्याचे बिल ठेकेदाराला अदा केले


उल्हासनगर :  शहरातील गुलराज टॉवर ते वडोलगाव रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन शहर अभियंता संदिप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान हे आमरण उपोषण सुरू केले आहे. माजी नगरसेवक महादेव सोनवणे भगवान मोहिते दशरथ चौधरी रामेश्वर गवई यांच्या हस्ते बुधवारी सकाळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.

उल्हासनगर कॅप ३ येथील पॅनल क्रमांक १२ गुलराज टॉवर ते वडोलगाव पूला पर्यंत रस्ता अद्यापही पूर्णपणे बनलेला नाही. तरी देखील त्या रस्त्याचे काम पूर्ण न होता शहर अभियंता यांनी जय भारत कन्स्ट्रक्शन चे व्यवस्थापक केशव यांना एक कोटीचे बिल दिल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला असून या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याने बुधवारपासून पॅनल क्रमांक बाराच्या माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे , माजी नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे , फिरोज खान, सुमनताई शेळके शालिनीताई गायकवाड रवींद्र केणे गजानन म्हात्रे, प्रकाश म्हात्रे,शरद म्हात्रे, रेखा जाधव, सचिन म्हात्रे,विनोद म्हात्रे,सागर म्हात्रे या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा वजा निवेदन उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिले होते . मात्र सदर रस्त्याचे काम अद्याप ही सुरु केले नसल्याने आज पासुन आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु संदिप जाधव यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्या रस्त्याचे सुरु केले नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला असे शिवाजी रगडे यांनी सांगितले .या उपोषणाला सर्व नागरिकांनी पाठिंबा दिला असुन प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार आही असा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला आहे.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121