इस्लामाबाद : “तालिबानला पाश्चात्य देशांनी मान्यता न दिल्यास पुन्हा एकदा ९/११ सारखा दहशतवादी हल्ला घडण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे तालिबानला मान्यता न देण्याची चूक या देशांनी करू नये,” असा इशारा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानला पाश्चात्य देशांनी दुसर्यांदा एकटे सोडले असून यामुळे या देशांमध्ये पुन्हा एकदा निर्वासितांचे संकट उभे राहणार असल्याचाही ईशारा युसुफ यांनी दिला आहे.९/११ रोजी २९९७ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता,तसेच अमेरिकेचे ५.५ दशलक्ष डॉलर चे नुकसान झाले होते.