
तबलीगी जमात आणि कुंभमेळ्याची अस्लम यांच्याकडून तुलना ?
स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी पसरले केंद्राकडे हात
मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी सण-उत्सवांना कडक एसओपी लावणार असे महाराष्ट्रचे कॅबिनेट मंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत. ".. अन्यथा तुम्ही पाहु शकता की कशाप्रकारे कुंभमेळयामुळे कोरोंनाच्या केसेस वाढत आहेत. हे तेच लोक आहेत ज्यांनी तबलीगी जमातला जबाबदार धरले होते", असा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.
तबलीगी जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणावर कोरोंनाचा प्रसार झाला असा आरोप सुरुवातीच्या काळात झाला होता.
अस्लम शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी हे वक्तव्य केले आहे. कुंभमेळ्यातील लोकांनी तबलीगी जमातवर आरोप केले होते, असा उलटा आरोप आता अस्लम यांनी लावला आहे. तसेच स्थलांतरीत मजूर आणि लघुउद्योगांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी अस्लम शेख यांनी केली आहे. लॉकडाउनसाठी आम्ही व्यवस्थित योजना तयार करत आहोत, असेही अस्लम शेख म्हणाले.