जगात अल्पसंख्य असूनही आक्रमक असलेला समाज फक्त याच देशात आढळून येतो. याचं कारण म्हणजे मुळात हा समाज अल्पसंख्य नाही. तर दुसरे कारण म्हणजे या समाजाचं जीवनाचं तत्त्वज्ञानच वेगळं आहे. इथे इतर धर्मांचा आदर, सन्मान, सहअस्तित्व या संकल्पनाच मान्य नाहीत. वरून तुम्हाला जगायचं असेल तर आम्ही सांगतो त्याच नियमांच्या आधारे जगावं लागेल किंवा आपला धर्म बदलावा लागेल, हाच अंतिम न्याय.
आसाममधील सरकारच्या गोरुखुटी प्रकल्पाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्यांना हुसकावून लावण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेत दोन हजारांहून अधिक संख्येच्या जमावाने पोलीस पथकांवर हल्ला केला. पोलीस पथकांवर दगडफेक करण्यात आली. शस्त्रांचा वापर करण्यात आला. परिणामी, पोलिसांनी गोळीबार केला. या सगळ्या प्रकारात दोन ठार, नऊ पोलिसांसह अनेक जखमी झाले. प्रकल्प आसाम सरकारचा आहे.
जमीन लोकांनी अतिक्रमित केली होती. ७२ हजार ४२० बिघा सरकारी जमीन लोकांनी अतिक्रमित केली होती. आसाममध्ये एक बिघा जमीन म्हणजे १४ हजार ४०० चौरस फूट जागा होते, हे येथे लक्षात घ्यायला हवे. एवढ्या मोठ्या जमिनीवर लोक, तेही एका विशिष्ट समुदायाचे, अतिक्रमण करतात आणि सरकार जेव्हा संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हा जमाव आक्रमक होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यात दखल घ्यावी लागते, ही अतिशय गंभीर बाब होय.
एका राज्यात एक सरकारी संस्था अमली पदार्थ विरोधी कारवाई करते. त्यात एका आघाडीच्या नटाचा मुलगा सापडतो. पुन्हा राज्य सरकारमधील एक मंत्री (एका विशिष्ट समुदायाचा) सर्व सामाजिक तसेच लोकशाही संकेत बाजूला सारून कारवाई करणार्या पथकाच्या प्रमुखाला उघडपणे नोकरी हिरावून घेण्याची धमकी देतो. अनेक तथाकथित पत्रकार हिरिरीने कारवाई करणार्या अधिकार्याच्या विरोधात आघाडी उघडतात.
गजबजलेल्या शहरात बॉम्ब स्फोट केले जातात. अपराध्यांना पकडून न्यायालयासमोर हजर केले जाते. न्यायालय फाशीची शिक्षा सुनावते. देशातील सर्वोच्च न्यायालय ही शिक्षा कायम करते. पण, ज्या दिवशी फाशीची अंमलबजावणी होणार असते, त्या मध्यरात्री काही वकील पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. सर्वोच्च न्यायालय त्यांचे म्हणणे ऐकून घेते. पण, शिक्षा कायम करते. तथाकथित अधिवक्ता न्याय झाला नाही म्हणून हातपाय आपटतो, सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देणारे वक्तव्य करतो. फाशी देण्यात आलेली व्यक्ती पुन्हा एका विशिष्ट समुदायाची असते.
एका प्रगतिशील पुरोगामी राज्यात काही साधूंना एका जमावाने लाठ्या काठ्यांनी, दगडांनी ठेचून, जीवे मारले. त्यावर प्रसिद्धी माध्यमे मूग गिळून शांत बसतात. सरकार कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. राजधानी असलेल्या शहरात, संसदेने बहुमताने पारित केलेले काही कायदे रद्द करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले जाते. काही महिने हा महामार्ग नागरिकांसाठी बंद करण्यात येतो.
लाखो सामान्य नागरिक या आंदोलनाने, त्यांच्या, तो हमरस्ता वापरण्याच्या अधिकारापासून वंचित राहतात. राज्य सरकार आंदोलकांना उघडपणे पाठिंबा देते. केंद्र सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत, तसेच सामान्य नागरिकांची गळचेपी बघत राहतं. न्यायालयाने दखल घेऊनदेखील आंदोलन सुरूच राहतं.राजधानीच्या शहरात दंगल होते. सुरक्षा बल हस्तक्षेप करून वातावरण शांत करते. पण, हजारो लाखो नागरिकांच्या झालेल्या ससेहोलपटीची योग्य ती दखल घेतलीच जात नाही. पुन्हा एक विशिष्ट समुदाय याला कारणीभूत असतो.
देशातील एका राज्यात लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात. एक पक्ष जो आधीपासून सत्तेत असतो, तोच पुन्हा बहुमत मिळवतो. प्रदेश विकासाची कामे करून नाही, तर एका विशिष्ट समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण करून. खरं तर दुसरा पक्षही मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीतच असतो. पण, एक समाज पटकन एकत्र येतो आणि आर्थिक, सामाजिकविषयक, वा वैचारिक मतभेद सोडून फक्त एकाच मुद्द्यावर मतदान करतो.
दुसरा समाज आपसातील आर्थिक, सामाजिक, वैचारिक मतभेद विसरूच शकत नाही. परिणाम निवडणुकीतला पराभव निवडणूकपश्चात हिंसाचारात होतो. सरकार आणि सत्तेतील पक्ष यांच्या वैचारिकतेचा फायदा घेत, एक समाज त्या प्रदेशात सूत्रबद्ध हिंसाचार करतो. हिंसाचार्यांना असलेले पोलीस संरक्षण आणि प्रतिकारासाठी लागणारी पूर्वतयारी नसल्याने एका समाजाला मार खावा लागतो. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेते.
सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी एका समाजाच्या धार्मिक स्थळांवरून ध्वनिक्षेपकावरून, दुसर्या समाजातील पुरुषांनी आपल्या तरुण बायका, मुली इथेच सोडून, प्रदेश सोडून निघून जावे, अशा घोषणा करण्यात येतात. त्यानंतर निर्घृण हत्याकांड घडत राहतं, सरकार कोणतीही परिणामकारक कारवाई करत नाही. लाखोंच्या संख्येने लोकं स्थलांतर करतात. शरणार्थी कॅम्पमध्ये त्यांना राहावे लागते. पिढ्यान्पिढ्यांची जमीनजुमला, संपत्ती सोडून, जीव वाचला, अब्रू वाचली, यावर समाधान मानावे लागते. पुन्हा एक समाज याकरिता कारणीभूत ठरतो.
तथाकथित अल्पसंख्याक : अशा अनेक घटनांचा उल्लेख सहज करता येईल आणि या सगळ्या घटनांना कारणीभूत असलेल्या समाजाला अल्पसंख्याक म्हटले जाते. जगात अल्पसंख्य असूनही आक्रमक असलेला समाज फक्त याच देशात आढळून येतो. याचं कारण म्हणजे मुळात हा समाज अल्पसंख्य नाही. तर दुसरे कारण म्हणजे या समाजाचं जीवनाचं तत्त्वज्ञानच वेगळं आहे. इथे इतर धर्मांचा आदर, सन्मान, सहअस्तित्व या संकल्पनाच मान्य नाहीत. वरून तुम्हाला जगायचं असेल तर आम्ही सांगतो त्याच नियमांच्या आधारे जगावं लागेल किंवा आपला धर्म बदलावा लागेल, हाच अंतिम न्याय. आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य ही अहंमन्यता. इतर मार्ग, इतर विचार यांचे अस्तित्वच अमान्य. असं तत्त्वज्ञान असताना सन्मान, आदर, सहअस्तित्व असूच शकत नाही.
पण कोणत्यातरी स्वप्निल, अव्यवहार्य संकल्पनांच्या आधारे राज्यशकट हाकण्याची तीव्र इच्छा असणार्या लोकांच्या हाती नेतृत्व गेले की कायदे, नियम, व्यवहार, सगळं ‘सर्वधर्मसमभाव’ या आवरणाखाली तथाकथित अल्पसंख्याकांना धार्जिणे होऊन बसतात. या अव्यवहार्य धोरणांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता तो समाज तयार करतो. जागतिक पातळीवर अव्यवहार्य आणि अपयशी ठरलेली साम्यवादी विचारसरणी या आक्रमक अल्पसंख्याकांना साथ देत शिक्षण आणि विशेष करून इतिहासाला विकृत आकार देते.
यातूनच आमच्यात जातीभेद, जातीद्वेष हेतूपुरस्सर निर्माण केला गेला. आमच्या मनात शाश्वत, सनातन, जीवनाचं तत्त्वज्ञान असलेल्या हिंदू धर्माबद्दल अनास्था निर्माण केली गेली. जे जे या मातीत तयार झाले, ते ते टाकाऊ, अशी सामाजिक मनोधारणा यातूनच तयार करण्यात आली. उलटपक्षी अल्पसंख्याक समाजाला मात्र वेगळी व्यवस्था निर्माण करू दिली गेली. हे हिंदू समाजावर, धर्मावर केलेले छुपे आक्रमणच होय.
६०-७० वर्षे तथाकथित पुरोगामी सरकार या सगळ्या कटकारस्थानांकडे दुर्लक्ष करीत होते. परिणामी, समाजधुरिणांमधे किंकर्तव्य मूढता वाढत गेली. विद्वानांनी कर्तव्यच्यूत होऊन, समाजाला शिक्षण देणे किंवा दिशा देणे सोडून दिले. तरीही गाढ झोपलेला हा हिंदू समाज जागा होतच नाही.आज खरं तर आपल्या उज्ज्वल परंपरांचा, तत्त्वज्ञानाचा, नीतिमूल्यांचा उद्घोष करायला हवा. भगवान श्रीकृष्ण, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, चतुरस्र सेनानी पहिल्या बाजीराव पेशव्यांचा जयघोष करत हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे. आपसातील मतभेद, जातीभेद विसरून एकसंध झाले पाहिजे.
आमचं अस्तित्व, आमच्या परंपरा, आमची संस्कृती, आमची नीतिमूल्य, आमचं तत्त्वज्ञान जर टिकवून ठेवायचं असेल, तर एकत्र होत संघर्ष केला पाहिजे. जो कोणी असा संघर्ष करू इच्छितो, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या सगळ्या संघर्षात प्रतिक्रियावादी न राहता खरं तर कृतिशील झाले पाहिजे. आपल्या क्षमतांनुसार, गुण कौशल्यांनुसार योगदान दिले पाहिजे. कोणत्याही खुर्चीच्या, पदाच्या, लोभापायी जरी राजकीय मतभेद निर्माण झाले असले, तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर एकत्र आलं पाहिजे. जे तुमचे आजपर्यंत नव्हते, ते तुमचे कधीच होणार नाहीत. सत्ताकारणापेक्षा धर्मकारण आणि समाजकारण नेहमीच महत्त्वाचे असते, हे जागतिक इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. इतिहासातील आक्रमणांचा आलेख पाहता आता संघर्ष नाकारणारी, तडजोडीची पडेल वृत्ती हिंदू समाजाने सोडून देणेच इष्ट ठरेल.
तेव्हा कठोपनिषदात सांगितलेले आणि स्वामी विवेकानंदांनी सतत आचरणीय म्हटलेले, ‘उत्तिष्ठत, जागृत, प्राप्य वरान्निबोधत’, हे बोधवाक्य आचरणात आणूयात. तेव्हा समस्त हिंदू समाजा, ऊठ, जागृत हो आणि आपल्या परंपरा, संस्कृती व धर्मकारण साध्य होतं नाही, तोपर्यंत आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल करीत राहा, त्याकरिता अखंड कृतिशील हो!
- डॉ. विवेक राजे