तब्बल दीड वर्षांनी वाजली शाळेची घंटा

सर्व नियम पाळून मुंबईसह राज्यभरातील अनेक शाळा सुरु

    04-Oct-2021
Total Views | 68

schools_1  H x
मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी होताच देशाभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु केल्या गेल्या. मात्र, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा सुरु केल्या गेल्या नव्हत्या. अखेर ४ ऑक्टोबरला शाळा सुरु करण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भेट झाली. ४ पासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू सुरु करण्यात आले आहेत. काही ठिकाणी शिक्षकांनी पुष्प आणि चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले, तर काहीठिकाणी बँड-बाजा वाजवत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
 
 
तब्बल दीड वर्षांनी विद्यार्थी, पलक आणि शिक्षकांना शाळेची घंटा ऐकायला मिळाली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दीड वर्ष शाळा बंड होत्या. अनेक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने सर्व वर्ग काही महिने चालू ठेवले होते. मात्र, अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्यात याव्यात, अशा मागण्या होत होत्या. राज्य सरकारने एक नियमावली बनवत सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांचे सर्व तपासणी करून मग त्यांना शाळेत प्रवेश दिला गेला. यावेळी अनेक शाळांनी नियमांचे पालन करत वर्ग सुरु केले आहेत.
 
 
राज्य सरकारकडून शाळांना हे आदेश...
 
 
> विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करण्यात यावे.
 
 
> सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, ज्या शिक्षकांची लसीकरण झालेले नाही त्या शिक्षकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे.
 
 
> सर्व शाळांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १००% लसीकरण करावे.
 
 
> लसीकरण झाले नाही म्हणून हे कारण देत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121