महाराष्ट्र : कोरोनाच्या विळख्याबरोबर राज्याचा मृत्यदरही वाढतोय?

    30-Jun-2020
Total Views | 33

Corona Maharashtra_1 


सोमवारी १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू; तर नव्या ५२५७ नवे रुग्ण


मुंबई : कोरोनाचा विळखा घट्ट झालेला दिसत असतानाच महाराष्ट्रात सोमवारी १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आता राज्याचा मृत्युदरही वाढतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी राज्यात ५२५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी मृत्यू झालेल्या १८१ रुग्णांमध्ये ७८ मृत्यू हे गेल्या ४८ तासांमधील आहेत. तर १०३ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १६९८८३ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ७३२९८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ७४२९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.


राज्यात सोमवारी २३८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहणार आहेत.


मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत नवीन १७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121