राज्यातील विद्यापिठांनी लवकरात लवकर आगामी धोरण जाहीर करावे : अभाविप

    01-May-2020
Total Views | 29


universities _1 &nbs




मुंबई
: युजीसीचे सूचना पत्रक हे सर्व विद्यापीठांवर बंधनकारक नसून ह्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य युजीसीने विद्यापीठांना दिले आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांनी लवकरात लवकर आपले आगामी धोरण स्पष्ट करावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकाद्वारे केली आहे.




पत्रकात म्हंटले आहे कि, युजीसीच्या पत्रकानुसार, ३१मे पर्यंत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात यावे. १ ते ३०जुन सुट्टी असावी १ ते १५जुलै दरम्यान अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा व १६ ते ३० जुलै प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच निकालाबाबत, अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचा निकाल ३१ जुलैला तसेच प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे निकाल १४ऑगस्टला घोषित व्हावे, पुढील शैक्षणिक वर्ष द्वितीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी १ ऑगस्ट पासून व प्रथम वर्षाचे १सप्टेंबर पासून सुरू करण्यात यावेत. अशी मागणी केली आहे.




पुढे अभाविपने केलेल्या मागणीचा युजीसीने विचार करत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी थेअरी व प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्यात यावे. पी.एच.डी व एम फील विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध जमा करण्यासाठी ६ महिन्याचा कालावधी वाढवण्यात यावा या निर्णयांचे अभाविप स्वागत करते. युजीसीच्या सूचनापत्रकानुसार, राज्यातील विद्यापिठांनी तसेच महाविद्यालयांनी सद्यस्थितीचा विचार करत ऑनलाइन वर्गासाठी ग्रामीण क्षेत्रातील अडचणी लक्षात घेऊन पावले उचलावी. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन, विद्यार्थीहित जपत विद्यापिठांनी आपले आगामी धोरण लवकरात लवकर स्पष्ट करावे अशी मागणी कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांनी पत्रकातून राज्यातील विद्यापीठांना केली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121