‘पूरपरिस्थितीत मदतीसाठी प्रशासन तत्पर’ : चंद्रकांत पाटील

    26-Sep-2019
Total Views | 35




मुंबई
: अतिवृष्टीमुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलीस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.



पुण्यात पावसाचा जोर वाढल्यापासून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून
, पाणी शिरलेल्या भागात तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना त्यांनी दिल्या. पूर परिस्थिती संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील नाझरे धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला. यामुळे कऱ्हा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. तसेच पुणे शहरातील कात्रज, व हवेली तालुक्यातील तलाव ओव्हर फ्लो झाल्यामुळे रहिवासी भागात पाणी शिरले. यानंतर जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य हाती घेण्यात आले. मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पाचारण करण्यात आले. तसेच, महसूल यंत्रणा, महापालिकेची अग्नीशमन दल, पोलीस यंत्रणा आदींनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवित आले आहे.



पाटील म्हणाले की
, “या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील अनेक भागात पाणी शिरले आहेत, या भागातील जवळपास २८ हजार ८०० जणांना आणि ६०२ जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या सर्वांसाठी ४४ ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. तर पुणे शहर ३५०० नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या अतिवृष्टीनंतर सतर्कतेसाठी पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले आहे. नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.” असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. अतिवृष्टीमुळे पुणे शहरातील सहकारनगरमध्ये रहिवासी इमारतीची भिंत कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बारामती मध्ये दोन आणि हवेली तालुक्यात तीन जण वाहून गेले आहेत. या दुर्घटनेतील मृतांबद्दल पालकमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली.



आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी पुणे जिल्हा ०२०-२६१२३३७१ आणि पुणे शहर ०२०-२४५४५४५४
, पुणे महानगरपालिका ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८००/०१/०२/०३, बारामती नगरपरिषद ०२११२२२२३०७ आणि ०२११२२२२४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121