सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षकारांना झटका

    25-Sep-2019
Total Views | 80




नवी दिल्ली
: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणावरील सुनावणीवेळी मुस्लीम पक्षकारांना जोरदार झटका दिला. बुधवारी अयोध्या प्रकरणाशी संबंधित सुनावणीच्या ३१व्या दिवशी आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडून (एएसआय) आपली बाजू मांडण्यात आली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने एएसआयच्या अहवालावर प्रश्न उभे करणारी बाजू पहिल्या अपिलात ऐकून घेण्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यावेळी म्हणाले की, “एएसआयच्या अहवालावर जो आक्षेप घेण्यात येत आहे, तो सुनावणीवेळी घेतला गेला नव्हता. तसेच या मुद्द्यावरील तुमची बाजू बळकट आणि ठोस नाही, कारण न्यायालय अशा प्रकरणात विशेषज्ज्ञांची समिती तयार करते, त्यावेळी त्यात काही कमतरता वा चूक असेल तर त्याबाबत सांगितले जाते.”



पुढे ते म्हणाले की
, “एएसआयच्या या अहवालाबाबत त्यावेळी असे काहीही झाले नव्हते. म्हणूनच सीपीसीच्या नियम २६ नुसारही आम्ही याला इथे म्हणजे पहिल्या अपिलात ऐकू शकत नाही. दरम्यान, मुस्लीम पक्षकारांकडून एएसआयच्या अहवालावर मीनाक्षी अरोरा यांनी सुनावणीच्या वेळी समोर न आलेले आक्षेप घेतले. परंतु, सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटले की, “पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी सादर केलेला अहवाल न्यायिक आयुक्ताच्या अनुसार प्रकियेनुरूपच होता. तुम्ही घेतलेले कोणतेही आक्षेप योग्य नाहीत, कारण तुम्ही पहिल्या अपिलात आक्षेप घेतले नव्हते.”



राम चबुतरा जन्मस्थान नाही
: मुस्लीम पक्षकार

एएसआयसंबंधित मुद्द्याआधी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी आपली भूमिका मांडली. राम चबुतरा हे श्रीराम जन्मस्थळ असल्याचे आम्ही स्वीकारलेले नाही, तर त्यावर हिंदूंची आस्था असून न्यायालयाने असे म्हटल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी मुस्लीम पक्षकारांनी राम चबुतर्‍याशी संबंधित सुनावणीवेळी राम चबुतर्‍याबद्दल निराळे विधान केले होते. पण आज बुधवारी त्यांनी आपल्या विधानावरून मजाव केले.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121