नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ३०वी सुनावणी पार पडली. यावेळी मुस्लीम पक्षाच्या वतीने वकील राजीव धवन यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने वकील जफरयाब जिलानी यांनी बाजू मांडली. धवन यांनी एकूण १४ दिवसांचा वेळ घेतला आहे. यापूर्वी हिंदू पक्षकारांच्या वतीने १६ दिवसात आपली बाजू मांडण्यात आली.
यावेळी राजीव धवन यांनी सांगितले की, नमाजच्या वेळी तिथे दुसरा कोणताही भोंगे वाजवू नये. धवन यांनी काही साक्षीदारांनी नोंदवलेल्या जबाबाचा दाखला दिला. सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने जफरयाब यांनी युक्तिवाद मांडण्यास सुरवात केली. जिलानी म्हणाले कि, रामचरित मानस व वाल्मिकी रामायणात कोठेही राममंदिराचा उल्लेख नाही. त्यावर न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला कि, रामचरित मानस किंवा वाल्मिकी रामायणात राममंदिराचा उल्लेख नाही तर हा मंदिर नसण्याचा पुरावा असू शकेल का? त्यापुढे न्या. बोबडे नी प्रश्न विचारला कि, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, यावर आक्षेप नाही? त्यावर जफरयाब यांनी रामचा जन्म अयोध्येत झाला हे मान्य करण्यात आक्षेप नसल्याचे सांगितले. मंदिर उद्ध्वस्त करून मशीद बांधण्यात आली का?, यासंबंधी प्रश्नांवर जफरयाब यांनी उत्तर दिले कि, बाबर याने मोकळ्या जागेवर मशीद बांधली. तेव्हा कोणतेही मंदिर अस्तित्वात नव्हते, असाही युक्तिवाद जाफरयाब यांनी केला आहे. जफारयाब गिलानी यांनी कोर्टाला सांगितले कि, बाबर याने मंदिर पडल्याचा कोणताही पुरावा नाही. मोहम्मद गझनी ने अनेक मंदिर ध्वस्त केल्याची नोंद आहे, अशीही कबुली गिलानी यांनी मंगळवारी दिली.