राम जन्मभूमी वादाप्रकरणी मुस्लिमांचा युक्तिवाद पूर्ण

    24-Sep-2019
Total Views | 32



नवी दिल्ली
: अयोध्येतील रामजन्मभूमी वादाप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ३०वी सुनावणी पार पडली
. यावेळी मुस्लीम पक्षाच्या वतीने वकील राजीव धवन यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने वकील जफरयाब जिलानी यांनी बाजू मांडली. धवन यांनी एकूण १४ दिवसांचा वेळ घेतला आहे. यापूर्वी हिंदू पक्षकारांच्या वतीने १६ दिवसात आपली बाजू मांडण्यात आली.


यावेळी राजीव धवन यांनी सांगितले की
, नमाजच्या वेळी तिथे दुसरा कोणताही भोंगे वाजवू नये. धवन यांनी काही साक्षीदारांनी नोंदवलेल्या जबाबाचा दाखला दिला. सुन्नी वक्फ बोर्डाच्या वतीने जफरयाब यांनी युक्तिवाद मांडण्यास सुरवात केली. जिलानी म्हणाले कि, रामचरित मानस व वाल्मिकी रामायणात कोठेही राममंदिराचा उल्लेख नाही. त्यावर न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला कि, रामचरित मानस किंवा वाल्मिकी रामायणात राममंदिराचा उल्लेख नाही तर हा मंदिर नसण्याचा पुरावा असू शकेल का? त्यापुढे न्या. बोबडे नी प्रश्न विचारला कि, रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, यावर आक्षेप नाही? त्यावर जफरयाब यांनी रामचा जन्म अयोध्येत झाला हे मान्य करण्यात आक्षेप नसल्याचे सांगितले. मंदिर उद्ध्वस्त करून मशीद बांधण्यात आली का?, यासंबंधी प्रश्नांवर जफरयाब यांनी उत्तर दिले कि, बाबर याने मोकळ्या जागेवर मशीद बांधली. तेव्हा कोणतेही मंदिर अस्तित्वात नव्हते, असाही युक्तिवाद जाफरयाब यांनी केला आहे. जफारयाब गिलानी यांनी कोर्टाला सांगितले कि, बाबर याने मंदिर पडल्याचा कोणताही पुरावा नाही. मोहम्मद गझनी ने अनेक मंदिर ध्वस्त केल्याची नोंद आहे, अशीही कबुली गिलानी यांनी मंगळवारी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121