मुंबई : उल्हासनगर येथे राहणाऱ्या तरुणीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा जाळीमुळे तिचा जीव वाचला. मंत्रालयात यापूर्वीही आत्महत्येचे प्रकार घडल्याने सुरक्षा जाळी बसवण्यात आली होती. याच जाळीमुळे तिचा जीव वाचू शकला.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या तरुणीने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा जाळीमुळे तिचा जीव वाचला.
— महा MTB (@TheMahaMTB) December 13, 2019
अधिक माहिती साठी क्लिक करा - https://t.co/3WsLkqFArj https://t.co/ONTAFfgT6E
उल्हासनगर येथे राहणाऱ्या या तरुणीने गेली सहा दिवस कामासाठी मंत्रालयाच्या चकरा मारल्या होत्या. मात्र, काम होत नसल्याच्या मनस्तापातून तिने हे पाऊल उचलले आहे. पोलीसांकडून तिची चौकशी सुरू असल्याची प्रार्थमिक माहिती देण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गुप्ता असे या तरुणीचे नाव आहे. नवऱ्याविरोधात एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विरोध करण्यासाठी हे पाऊल तिने उचलले आहे. ही तरुणी उल्हासनगर येथे राहणारी असून तिला पुढील उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अखेर खातेवाटपाला मुहूर्त मिळाला #UddhavThackeray #NCP #BreakingNews https://t.co/bcScCfGOfi
— महा MTB (@TheMahaMTB) December 12, 2019