नवी दिल्ली : रेल्वेमध्ये प्रवास करत असताना जर तुम्ही जेवण केले तर तुम्हाला अनेकदा बिल दिले जात नाही. मात्र, आता रेल्वेत प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचे बिल मिळाले नाही तर ते जेवण फुकट असणार आहे. रेल्वेच्या केटरिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
"No tips please, if no bill, your meal is free" to be displayed in #Indian #Railway coaches soon https://t.co/phyC6ZhxLy
— South Western Railway (@SWRRLY) January 5, 2019
या उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मार्च महिन्यापासून रेल्वेमध्ये सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने जेवणाच्या किंमती लावल्या जाणार आहेत. तसेच रेल्वेत लावण्यात येणाऱ्या या तक्त्यामध्ये ‘कृपया टीप देऊ नका, बिल मिळालं नाही तर तुमचं जेवण फुकट' अशा आशयाचा एक संदेश लिहिला जाणार आहे. यासोबतच प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्याचा गोयल यांनी आदेश दिला असून यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/