विकास पोहोचल्यामुळेच नक्षलवाद घटला : अकबर

    26-Aug-2018
Total Views | 15
 

 
 
 
म्हापसा (गोवा) : दुर्गम क्षेत्रात विकास पोहोचल्यामुळेच तिथे होणाऱ्या नक्षलवादी कारवाया आता कमी झाल्या आहेत असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी केले आहे. गोव्यातील म्हापसा येथे एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. केंद्र सरकारद्वारा सर्वत्र सुरु असलेल्या विकासामुळेच नक्षलवाद व हिंसाचार कमी झाल्याचा दावा अकबर यांनी यावेळी केला.
 
 
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचा लाभ सर्वदूर दुर्गम क्षेत्रातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचाच परिणाम म्हणून अतिदुर्गम क्षेत्रातील नागरिक देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या दुर्गमतेचे व दारिद्र्याचे भांडवल करून नक्षलवाद फोफावला आता प्रत्यक्ष त्या भागात विकास पोहोचायला लागल्यामुळे तेथील नक्षलवाद कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील लोकांनी विकास कधी पाहिलाच नव्हता असे अकबर यावेळी म्हणाले.
 
 
नरेंंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून केंद्र सरकारने गरीब आणि उपेक्षित जनताच विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम आखले गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मोदी सरकारच्या काळात रोजगारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रोजगार उपलब्ध झाल्यामुळेच लोक समाधानी असून असे झाले नसते तर लोक रस्त्यावर उतरले असते असे अकबर यावेळी म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

‘लाडकी बहीण’ योजना आता सिनेमाच्या रूपात; अण्णा नाईक व गौतमी पाटील झळकणार प्रमुख भूमिकांमध्ये!

महाराष्ट्र सरकारच्या जनहितकारी योजनांपैकी विशेष चर्चेत आलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाडकी बहीण’ या शीर्षकाने मराठी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या विषयावर आधारित हा पहिलाच सिनेमा असल्याने सर्वसामान्यांमध्ये याविषयी उत्सुकता वाढली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना गणेश शिंदे यांनी मांडली असून, निर्मितीची धुरा शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे या निर्मात्यांनी ओम साई ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121