पावसामुळे मुंबईत सोसायटीजवळील जमीन खचली

    25-Jun-2018
Total Views | 20

नागरिकांच्या जीवाला धोका



मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील वडाळा येथे जमीन खचल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका रहिवाशी सोसायटीच्या मागेच ही घटना घडली असून यामुळे सोसायटीमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

वडाळा येथे असलेल्या 'लॉएड इस्टेट' या सोसायटीच्या मागे ही दुर्घटना घडली आहे. लॉएड इस्टेटच्या मागील रस्त्यावर रस्त्याजवळ 'दोस्ती अपार्टमेंट' या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. काल दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसानंतर या दोन्ही इमारतींमधील रस्ता अचानक खचला. यावेळी या रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या काही चारचाकी गाड्या देखील खचलेल्या जमिनीसह खाली गेल्या. यामुळे दोस्ती अपार्टमेंटची कंपाऊंड वॉल देखील तुटली तसेच गाड्यांचे देखील नुकसान झाले.


दरम्यान लॉएड इस्टेटच्या अगदी जवळच ही घटना घडल्यामुळे सोसायटीमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दोस्ती अपार्टमेंटच्या बांधकामामुळेच ही घटना घडल्याचा आरोप लॉएड इस्टेटमधील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते...

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

सामाजिक संघटन व परिवर्तन हे संघाचे यशस्वी मॉडेल : अनिल जोशी

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या यात्रेने हे सिद्ध केले की, सामाजिक संघटन आणि सामाजिक परिवर्तन हे प्रभावी मॉडेल आहे,” असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र, गोवा, गुजरात क्षेत्र बौद्धिक प्रमुख अनिल जोशी यांनी काढले. रा. स्व. संघाचा पश्चिम क्षेत्र स्तरावरील कार्यकर्ता विकास वर्ग-प्रथमचा प्रकट समारोप नुकताच विद्याप्रबोधिनी प्रशालेच्या मैदानावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ‘आर्मस्ट्राँग’ कंपनीचे सहसंस्थापक व कार्यकारी संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121