विजचोरांकडून दीड कोटींचे वसूली

    26-Nov-2018
Total Views | 26



शहापूर : शहापूर तालुक्यातील महावितरणच्या कडून गेल्या दिड वर्षात तालुक्यतील ५०४ ग्राहकांवर वीजचोरी अंतर्गत कारवाई करून सुमारे दीड कोटींची वसुली महावितरणे केल्याचे समोर आले आहे. तर या दरम्यान तालुक्यातील ८० गांवे व ७ पाडयातील ६०० आदीवासी बांधवांना सौभाग्य योजनेतून मोफत वीज कनेक्शन दिल्याची माहिती महावितरणचे उपअभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.

 

शहापूर तालुक्यात २२८ गावे व ३६५ पाडयांच्या कार्यक्षेत्रात सामान्य ग्राहक ६९ हजार ९०० इतके असून औद्योगिक ग्राहक १२१,लघु उद्योग ग्राहक १०६० ,पाणीपुरवठा योजना १०२ व ग्रामपंचातयतीच्या ७०० ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. या सर्व ग्राहकांकडून महिन्याला सुमारे १५ कोटी रूपये देयकांच्या माध्यमातून सुमारे ८० ते ९० टक्के वसुली होते. मात्र ही वसुली करताना स्थानिक अधिका-यांचे गोपनिय पथक तयार करून तालुक्यात गेल्या दीड वर्षात वीजचोरी अंतर्गत केलेल्या कारवाईत १ कोटी ४० लाख इतकी दंडासह वसुली एकुण ५०४ ग्राहकांकडून केली.” माहिती उपअभियंता अविनाश कटकवार यांनी दिली.

 

दरम्यान तालुक्याच्या शहरीकरणाचा विचार करून आमदार पांडुरंग बरोरा यांनी वीज महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून तालुक्यातील जनतेच्या हितासाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन डिव्हिजन करण्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच महावितरणकडून सबस्टेशन, पोल बदलणे, नवीन विद्युत वाहिन्या टाकणे आदी अनेक विकास कामे सुरू असल्याचेही कटकवार यांनी सांगितले. जर ३ सबस्टेशन व २ डिव्हिजन झाले तर तालुक्यातील ग्राहकांच्या समस्या दूर होतील असा विश्वास उपअभियंता कटकवार यांनी व्यक्त केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121