मिग- २९ लढाऊ विमाने केली अपग्रेड

    07-Oct-2018
Total Views | 23


 

 

जालंधर: कारगिल युद्धामध्ये खारीचा वाटा असणारे मिग २९ या विमानांचे अपग्रेड करणार आहेत. यामुळे विमानाची मारक क्षमता वाढली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपग्रेडेशन नंतर ही विमाने हवेतच इंधन भरू शकणार आहेत. तसेच या विमानातून एकावेळी अनेक दिशांना मारा करता येऊ शकतो. ही विमानं चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर तैनात असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.

 

भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यास दुश्मनांच्या विमानाला रोखण्यासाठी केवळ ५ मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला मिळालेली आहे. जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती. आता डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे. विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे. गेल्या आठवड्यात हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेल्या 'मिग-२९' विमानांची प्रत्यक्षिकं सादर करण्यात आली.

 

१९९९ च्या कारगिल लढाई दरम्यान 'मिग-२९' विमानांनी पाक सैन्याला पराभूत करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. ही लढाऊ विमाने रशियाकडून १९८० मध्ये खरेदी करण्यात आली होती. हवाई दलाचे अदमपूर विमानतळ हे पाकिस्तानपासून १०० किमी आणि चीनपासून २५० किमी अंतरावर आहे. यामुळे सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेली 'मिग-२९' विमानं तैनात करण्यात आली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

मुंब्रा घटनेबाबत कोणतीही माहिती असेल तर संपर्क साधा -  मध्य रेल्वेचे प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना आवाहन - घटनेच्या तपासासाठी मध्य रेल्वेची समिती

दिवा-मुंब्रा घटनेबद्दल माहितीसाठी मध्य रेल्वेचे जनतेला आवाहन केले आहे. सोमवार, दि.९.०६.२०२५ रोजी सकाळी ९.०१ वाजताच्या सुमारास झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करणारे सुमारे ८ जण त्यांचा तोल गेला आणि चालत्या ट्रेनमधून पडले. रेल्वे प्रशासनाने या घटनेचे कारण तपासण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याचसोबत प्रवासी जनता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित बाबींबद्दल कोणतीही ..

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती भूसंपादनासाठी २२ हजार कोटींच्या कर्जाला शासन हमी

आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे...

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

मुंबई मेट्रो ९ने गाठला महत्वाचा टप्पा एमएमआरडीएने दिली माहिती

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले, असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121