"पद्मजाचा सांगितीक प्रवास सांगणारा ग्रंथ आज इथे प्रकाशित होतो आहे, याचा मला आनंद आहे. शास्त्रीय संगीत, भावसंगीताच्या माध्यमातून तिने आपली साधना निरंतर सुरु ठेवली. खरं सांगायचं तर पद्मजाचं गाणं म्हणजे स्वरसाम्यर्थ्याचं प्रतीक आहे" असे प्रतिपादन पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले. 'स्वरचंद्रीका : एक सांगितिक प्रवास' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " रुढार्थाने सिनेगीतांच्या वाटेवर न चालता पद्मजाने भावगीतांच्या माध्यमातून स्वताची वेगळी ओळख
Read More
मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय वंश,
“ विद्यार्थी ज्यावेळेस गुरुकडे एखादी गोष्ट शिकायाला जातो, तेव्हा संपूर्ण शरणागतीच्या भावनेने त्याने जावं. गाण्याच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की गुरुला शरण गेल्याशिवाय संगीत साधना अशक्य आहे.” असे मत सुप्रसिद्ध व्होयलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी आपल्या सांगितीक प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की “ मी ज्या मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले, मग ते पंडिचत बी.एस. मठ गुरुजी असतील, दातार गुरुजी असतील, किश
आज डिजिटल युगात, व्हिडिओ रील्स आणि स्टोरीजच्या गर्दीत भक्तीचे निवांत अस्तित्व शक्य आहे का? तर हो! आणि हे शक्य करून दाखवले आहे ‘अभंग रिपोस्ट’ या तरुणांच्या जोशात मिसळलेल्या भक्तिगटाने. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी पारंपरिक अभंगांना आधुनिक सूरांची शाल ओढवली. पण, मूळ भावनेचा गाभा टिकवून! आज खास आषाढी एकादशीनिमित्ताने या ‘अभंग रिपोस्ट’च्या टीमशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
'एक तिची गोष्ट' नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
"संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, संगीतामुळे आपल्या संवेदना चिरकाल जीवंत राहतात " असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५ आणि आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दि. २१ जून रोजी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे पार पार पडला. यावेळी महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आशाताई भोसले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सां
जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देशातील पहिल्या सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव, तसेच महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. १७ जून रोजी केली.
कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणार पहिला 'राज्य प्रेरणा गीत पुरस्कार' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी..." या गीताला प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार, दि. २७ मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा ‘स्टाईल आयकॅान’ असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीचा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतोय.
" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य
बुधवारी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून माटुंग्याच्या यशवंत नाट्यग्रहाच्या साळगावकर रंगमंचावर"आपण आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीने सादर करण्यात आलेला आनंदसोहळा रसिकांची मने हेलावणारा ठरला.मुंबई आणि मुंबई लगतच्या उपनगरातील अनाथाश्रमातील वय वर्षे ७०-७५ पासून १०-१५ वर्षापर्यंतच्या मुला- मुलींनी गाणे-नृत्याविष्कारातू प्रेक्षकांची चांगलीच दाद घेतली!
शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या पंचम निषाद या संस्थेने आपल्या प्रतिष्ठित प्रातःस्वर संगीत मालिकेच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. या मालिकेचे १३१ वे पुष्प रविवार दिनांक ९ मार्च रोजी पहाटे ६:३० वाजता गुंफले जाणार आहे. या विशेष प्रसंगी शास्त्रीय संगीताचे दोन नामवंत कलाकार जयतीर्थ मेवुंडी (गायन) आणि प्रविण गोडखिंडी (बासरी) अनोखे युगल सादरीकरण करणार आहेत. प्रभादेवी इथल्या नूतनीकृत रवींद्र नाट्यमंदिराच्या संकुलात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
स्वत:च्या सर्व जबाबदार्या पूर्ण करत मराठी संगीत रंगभूमीची सेवा करणार्या गुणवंत अभिनेत्री, कलाकार प्राजक्ता शहाणे यांच्याविषयी...
भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!
शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंह ( Guru Govind Singh ), हे थोर योद्धे, दार्शनिक चिंतक लेखक आणि संगीत मर्मज्ञ कवी होते. महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांचे बलिदान स्मारक, गुरूद्वारा आहे. त्यांच्या नावावर अनेक काव्यग्रंथ आहेत. प्रभु रामचंद्राविषयी त्यांच्या मनी विशेष श्रद्धाभाव होता. त्यांचा ‘२४ अवतार’ नावाचा ग्रंथ सर्वपरिचित आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यग्रंथ म्हणजे ‘रामावतार’ होय. गोविंदसिंह यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी इ. स. १६९८ साली त्यांनी, सतलज नदी किनारी नैना देवी परिसरात ‘र
मन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा’.... खरंच काळाच्या प्रवाहात बदललेले संगीत कितीही ऐकले, आत्मसात केले तरीही नाट्य संगीताचा प्रभाव ( Sangeet Manapmaan ) आणि मनावर त्याचा होणारा सकारात्मक परिणाम काही वेगळाच. १८४३ साली संगीत नाटकाची सुरुवात झाली. त्यानंतर असंख्य संगीत नाटके प्रसिद्धीस आली. प्रेक्षकांनी त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले, प्रतिसादही दिला. १९११ साली मराठी रंगभूमीवर आलेले ‘संगीत मानापमान’ या संगीत नाटकाने इतिहासच रचला. कृष्णाजी खाडिलकर लिखित या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले होते, गोविंदराव टेंब
अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा हिंदी चित्रपटसृष्टीत मोठा चाहता वर्ग आहे.काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून तिचं नाव दुआ असं आहे. दरम्यान, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दीपिका चाहत्यांसमोर आली असून तिने पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या बंगळूरमधील गाण्याच्या कॉन्सर्टला हजेरी लावून धमाल केली. सध्या दीपिकाचा आनंदीत होत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वसामान्यांना हक्क, अधिकार मिळाले. या अधिकार, हक्कांनी कित्येकांचे आयुष्य बदलले. ही माणूस म्हणून घडण्याची गोष्ट भीमराया तुझ्यामुळे या व्हिडिओतून अनोख्या आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या म्युझिक व्हिडिओतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाला अभिवादन करण्यात आलं आहे.
पणजी : पणजी येथे नुकताच ५५वा ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ पार पडला. जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांनी आपले प्रदर्शन जागतिक स्तरावर करत आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, यावर्षी इफ्फीमध्ये ‘फ्रजाईल फ्लॉवर’ हा व्हिएतनामी भाषेतील चित्रपट ( Musical Film ) सादर झाला असून, हा चित्रपट पहिल्यांदाच भारतात हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मायथ्यू विएन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधत भारतात व्हिएतनामी चित्रपट का प्रदर्शित करावासा वाटला याबद्दल माहिती दिली.
"मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी "तली मंडळी सादर करत आहेत हे गाणं जे सर्वांसाठी COPYRIGHT FREE आहे.!! कुणीही कुठेही अपलोड करू शकता. धम्माल गाणं Enjoy करा, Hook step वर Reels करा आणि आम्हाला टॅग करा..!!! 🤩😍
गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. अनेक दिग्गज मंडळींनी शारदा सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोण होत्या या शारदा सिन्हा आणि काय आहे त्यांचं संगीत विश्वातलं स्थान जाणून घेऊया या व्हिडिओमधून.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचे देशविदेशात म्यूझिक कॉन्सर्ट होत असतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमधला गोंधळ ताजा होताच आता आणखी एक नवीन गोंधळ समोर आला आहे. नुकताच जयपूरमध्ये त्याचा कॉन्सर्ट मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कॉन्सर्टला आलेल्या चाहत्यांना मोठा फटका बसला. दिलजीतच्या कॉन्सर्टच्या गर्दीत चोरांनी चांगलाच हात साफ करुन घेतला. कॉन्सर्टनंतर अनेक चाहत्यांचे फोन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली.
जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय 'वन डायरेक्शन' या बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने येथे गायकाचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. वयाच्या ३१ व्या वर्षीं त्याचा मृत्यू झाला असून लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात आपली छाप उमटवली आहे. आनंदाची बाब म्हणजे ऑस्कर २०२५ च्या फॉरेन लॅगवेज फिचर फिल्म या कॅटेगरीत स्वतंत्रपणे हा चित्रपट पाठवण्यात आल्याची माहिती दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी दिली. संगीत क्षेत्रातील अजरामराची ऑस्कर वारी खरंच प्रत्येक बाबूजींच्या चाहत्यांसाठी सुखावणारी आहे.
गेल्या २-३ दिवसांपासून सोशल मिडियावर कोल्ड प्ले ट्रेंड करत आहे.. कोल्ड प्लेच्या कॉन्सर्स्टची तिकीटं न मिळाल्यामुळे हताश झालेल्या चाहत्यांनी सोशल मिडियावर नाराजी देखीस व्यक्त केलेली पाहायला मिळाली..
वैद्यकीय व्यवसायात कार्यरत डॉक्टरांपासून ते परिचारिकांपर्यंतचे सर्वच कर्मचारी म्हणजे पृथ्वीवरचे देवदूतच! पण, सध्या इतरांना जीवनदान देणार्या या वैद्यकीय पेशातील मंडळींच्या जीवावरच काही राक्षस उठलेले दिसतात. विशेषत्वाने या क्षेत्रातील महिलांची अब्रू धोक्यात आल्याचेे कोलकाताच्या बलात्कार प्रकरणानंतर पुनश्च अधोेरेखित झाले. त्यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ. संगीता अंभोरे यांनी याविषयीचे मांडलेले परखड वास्तव...
मराठी मनोरंजनविश्वातील संगीतकार, गीतकार, गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी अलीकडे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर चालू घडामोडींवर परखड मतं देखील मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी मराठमोळा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सोबत गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचे वडिल वरिष्ठ कर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयातील नियुक्त वरिष्ठ वकील ॲड. श्रीकृष्ण नरहर इनामदार यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीकृष्ण यांच्या पश्चात पत्नी ललकारी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे.
चर्चगेट येथील एस.एन. डी. टी. (SNDT) कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एस. सी. बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वूमन या महाविद्यालयात सुगम संगीत प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्टपासून हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे.
अभिनेता आमिर खान, अभिनेत्री तृप्ती डिमरी यांनी नुकतंच मुंबईत घर घेतलं होतं. या यादीत आता गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाचा समावेश झाला आहे. जावेद अख्तर यांनीही मुंबईत जुहू येथे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
बालपणापासून जीवांचे मैत्र बनत पशुवैद्यकीय पेशातून प्राणिमात्रांची सेवा करणारे गिटारवादक संगीतप्रेमी डॉ. अजित गोरे यांच्याविषयी...
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातल
शिट्टीच्या स्वरुपात संगीताचे सूर सातासमुद्रापलीकडे नेणार्या ‘स्मायलिंग व्हिल्सर’ म्हणून सुपरिचित, मुंबईच्या निखिल राणे यांच्याविषयी...
ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा अर्थात गीतकार, संगीतकार सुधीर फडके (Sudhir Phadke) यांचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Sudhir Phadke) या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमीट योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत साकारले आहे. या भित्तिशिल्पाचे अनावरण दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, तसेच मंगेशकर कुटुंबिय व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनी आपल्या देशातील असामान्य बाल प्रतिभेला प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोची तिसरी आवृत्ती ‘सुपरस्टार सिंगर सीझन ३’ घेऊन येत आहे. संगीत क्षेत्रातील नव्या दमाच्या गायकांना हक्काचा मंच देऊ करणाऱ्या या शो मधून हिंदी चित्रपटसृष्टीतल संगीत समृद्ध करणारे तीन ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि गीतकार अर्थात प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती भारतीय संगीताचा वारसा देखील समृद्ध करत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक पातळीवरील ग्रॅमी पुरस्कार मिळणे म्हणजे प्रत्येक कलावंताला त्याने आजवर केलेल्या कामगिरीला योग्य गौरव जगाच्या पाठीवर मिळाला हे सिद्ध करते. आजवर ग्रॅमी पुरस्कारावर भारतीय कलाकारांनी आपल्या नावावर केले आहेत. यंदाही हा बहुमान भारताला मिळाला आहे. प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडच्या धीस मुवमेंट अल्बमचा ६६ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला. याशिवाय जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनी आपल्या नावावर ३ ग्रॅमी पुरस्कार कोरले आहेत.
ज्येष्ठ गायिका ‘पद्मविभूषण’ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच दि. १४ जानेवारी रोजी निधन झाले. हिंदुस्थानी संगीतातील एक दिग्गज विचारवंत कलाकार असणार्या, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना वाहिलेली ही आदरांजली.
स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (१३ सप्टेंबर १९३२-१३ जानेवारी २०२४) या भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातल्या एक अत्यंत महत्त्वाच्या कलाकार होत्या. नितांत सुंदर गायनाबरोबरच चिंतनकार, सिद्धहस्त रचनाकार, लेखिका, कवयित्री आणि गुरू म्हणूनही त्या अतिशय लोकप्रिय होत्या. त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच लाभलेल्या गुरू सहवासाबद्दल सांगत आहेत, त्यांचे वरिष्ठ शिष्य आणि ख्यातनाम गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर.
राशिदभाई हे रामपूर सहसवान घराण्याचे असून, इनायत हुसेन खाँ साहेब यांचे ते पणतू होते. फार कष्टाने, मेहनतीने आणि रियाजाने राशिद भाईंनी त्यांना मिळालेली विद्या आणि ज्ञान टिकवले आणि त्यांच्या गायकीतून अनेक श्रोत्यांना भारतीय राग संगीतातला आत्मिक आनंद प्रदान केला. (sportify app) वरती दहा लाखांहून अधिक वेळा प्रत्येक महिन्यात राशिद भाईंना ऐकले जाते, म्हणून मला असे वाटते की, ते कालच्या प्राचीन संगीतापासून ते आजचे प्रायोगिक भारतीय संगीत लीलया हाताळणारे, एक सामर्थ्यशाली कलाकार होते.
ख्यातनाम शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी प्रभा अत्रे (वय ९१) यांचे शनिवारी दि. १३ जानेवारीला पहाटे पुण्यात दुःखद निधन झाले. गेली अनेक दशके शास्त्रीय गायनासोबतच विविध गायन प्रकारांतून त्यांनी उच्चकोटीचे योगदान दिले. त्यांचा संगीत विषयाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अनेक नव्या संगीत रचना केल्या आणि ग्रंथ लेखनही केले आहे. त्यांना ‘पद्मविभूषण’सह तीनही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
नुकताच अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला. यावेळी पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, “भारतीय चित्रपटाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील”. तसेच, आता संवेदनशीलता आणि रसिकता याचा मिलाफ होत असताना अशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर आपण किती काळ राहतो, यावरही भवितव्य अवलंबून असेल, असेही मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
दि. ३१ डिसेंबर रोजी नववर्षांच्या मुहुर्तांवर वर्षाच्या शेवटच्या दिवशी संगीत, जुने आणि नवीन लोकप्रिय बॉलीवूड, रोमँटिक, डान्सिंग बीट्स गाणी, धुन, त्यानंतर नॉन-स्टॉप डीजे , मध्यरात्री ८ वाजता लोणावळा येथील प्रसिद्ध अशा कुमार रिसॉर्टवर 'सुरांजली'चा संगीत शो आयोजित करण्यात आला आहे, सर्व संगीत प्रेमींनी याचा आनंद घ्यावा, बुकींग करिता www.suranjali.in या वेबसाइट वर किँवा ८४५१८८८०२४ या नंबर वर संपर्क साधा.
गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ दि. १० जुलै, १९२६ कल्याणमध्ये ‘कल्याण गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत सूरप्रेमींचे हक्काचे स्थान म्हणून ‘कल्याण गायन समाज’ची ओळख आहे. आज ९७ वर्षे पूर्ण होत असताना आपले स्थान गायन समाजाने जपले आहे. ‘कल्याण गायन समाजा’च्या सुरेल कारकिर्दीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वस्तिक’गोवा तर्फे डॉ. पं. प्रविण गावकर यांचे शास्त्रीय संगीतावरील रियाजाच्या ‘स्वरयज्ञ’ तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर २२ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत रोजी गोव्यातील साळ मधील राऊत फार्म या निसर्ग रम्य ठिकाणी होणार आहे. या शिबिरात ८ ते ६० वर्ष वयोगटातील संगीत प्रेमींना यात सहभाग घेता येणार आहे. दरम्यान, या शिबिराचे आयोजन गेले १६ वर्ष केले जात आहे.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींवरून समस्त प्रेक्षकवर्गाला धुंद करणारे ज्येष्ठ कलाकार, व्हायोलिनवादक पं. मिलिंद रायकर. मूळचे गोव्यातील. परंतु, त्यांचा गोवा ते मुंबई प्रवास त्यांच्या संगीत साधनेइतकाच खडतर, रोमहर्षक आहे. त्यांच्या या सूरसाधनेविषयी..
संगीताची आवड असल्याने त्याचाच ध्यास घेऊन घाटंजी ते यवतमाळ, यवतमाळ ते पुणे आणि पुणे ते नाशिक असा प्रवास केलेल्या डॉ. अविराज तायडे यांच्याविषयी..
स्वरोदय शास्त्राच्या साधनेने स्वरांचा पंचगुणात्मक अनुभव येतो व साधक रागरागिण्यांची स्वरुपे, सहवास आणि तत्सम पंचगुण अनुभवू शकतो. श्रीकृष्णाच्या रासक्रीडेतील अनुभव असल्याच स्वरज्ञानींना येऊ शकतात. जड उपकरणातून हे अनुभव येत नाहीत.