कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना सर्वस्वी दुर्दैवीच. पण, त्यावरुन राजकीय डाव साधत, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अखिलेश यादवांनी केलेला प्रकार त्याहूनही अश्लाघ्य! पण, अखिलेश यांच्या पिताश्रींच्याच आदेशावरुन कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारातून शरयू नदी बलिदानाच्या रक्ताने लाल झाली होती. त्या रक्ताळलेल्या शरयूची आठवण तुम्हाला येते का हो अखिलेश?
Read More
समाजवादी पक्षाचे नेते सुरेश यादव यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना, हा पक्ष म्हणजे हिंदू दहशतवादी संघटना असल्याचे बेताल वक्तव्यं केले होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात नियोजीत केलेल्या आंदोलनात त्यांनी हे वक्तव्यं केले होते. यादव यांच्यावर जेव्हा माध्यमांमधून टीकेची झोड उठली, तेव्हा यादव यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला.
कल्याण : कल्याणमध्ये ( Kalyan Case ) मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि इतर चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या सहा आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांनी प्रांतवादाचा रंग देऊन परिस्थिती अधिक चिघळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे, फिर्यादींच्या वकिलांनी या घटनेवर कठोर भूमिका घेत न्यायाची मागणी केली आहे.
(Kalyan) येथील योगीधाम परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना त्यांच्या शेजारी अखिलेश शुक्ला या अमराठी सरकारी अधिकाऱ्याने गुंड बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात तणावाचे वातावरण होते. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा सगळीकडे पसरला आहे. उमेदवारांची घोषणा, क्रमाक्रमाने पक्षाच्या येणाऱ्या याद्या, नाराजीनाट्य हे सगळीकडे बघायला मिळतो आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा आणि मुख्यमंत्री पदावरून रंगणारी संगीतखुर्ची यामध्ये आता नवीनच प्रश्नाची भर पडली आहे. इतर राज्यांमध्ये गळ्यात गळे घालून मिरवणारे सपा-काँग्रेस महाराष्ट्रात वेगळे होण्याची चिन्हं दिसत आहेत.
तिकडे उत्तर प्रदेशात विधानसभेची पोटनिवडणूक असताना, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव इकडे महाराष्ट्रात घिरट्या घालायला नुकतेच आले होते. सपाचे आकाश तसेही मोकळेच आणि फक्त विशिष्ट समाजासाठी तर ते पुरते खुले असते. त्यामुळे अशाच विशिष्ट आंजारण्यात-गोंजारण्यात अखिलेशबाबू कसलीही कसर सोडत नाही. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला, परंतु या दौर्यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मविआचाही विचका केला. इकडे उबाठा गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून ‘तू-तू मैं-मैं’
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, अखिलेश यादव हे गुंडांसमोर नाक रगडतात. ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट सरळ करता येत नाही, त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाशी निगडित असलेले कधीही सुधारणार नाहीत. त्यांच्यात औरंगजेबाचा आत्मा शिरला आहे. त्यांना हिंदूंविरोधी वागण्यास प्रोत्सहान देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यांनी अयोध्येत विकासकामांचे उद्घाटन करतेवेळी उपस्थितांना संबोधित केले आहे.
"गुन्हेगारांवर बुलडोझर चालविण्यासाठी इच्छाशक्ती हवी. दंगेखोरांपुढे नतमस्तक होणाऱ्यांना बुलडोझर कारवाई झेपणारी नाही" असा सणसणीत टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपाप्रमुख अखिलेश यादव यांना लगावला आहे.
Nawab Singh Rape Case अखिलेश यादवचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात फॉरेन्सीन कक्षाने ज्या पीडितेवर अन्याय झाला तिची वैद्यकीय तपासणी केली असता नवाबसिंहांचे रक्त आणि पीडितेचे रक्त एकत्र जुळले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
Nawab Singh उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पीडित युवतीने समाजवादी नेता नवाब हिंस यादवच्या महाविद्यालयात नोकरीची मागणी केली होती. यावेळी नवाब सिंहने पीडित युवतीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितीची आत्या त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी पीडितेच्या आत्याने याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. ही घटना कनौज येथील कोतवाली नगर येथील समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंग यादव यांच्या महाव
उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान आणि त्यांचा नोकर राजू यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे.
१८व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचा निकाल लागूनही उद्या महिना होईल. संसदेतही घमासान अपेक्षेप्रमाणे सुरू आहेच.
‘इंडी’ आघाडीतील सर्व पक्षांमध्ये आत्मविश्वासच नसल्याने प्रत्येक पक्ष त्याच्या मनाला येईल, तसे दावे करीत आहे. पण, भाजपला नक्की किती जागा मिळतील, त्याबद्दल ‘इंडी’ आघाडीतीलच नव्हे, तर काँग्रेसमधील नेत्यांमध्येही एकवाक्यता नाही. आपल्या आघाडीचा दारूण पराभव होईल, याची ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांना मनोमन खात्री आहे, याचे ते निदर्शकच म्हणावे लागेल.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार याविषयी इंडी आघाडीचे दोन प्रमुख नेते – अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. त्यामुळे इंडी आघाडीलाच आपल्या विजयाविषयी खात्री नसल्याची चर्चा रंगली आहे.
समाजवादी पक्षाने (सपा) लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा बुधवारी प्रकाशित केला. यामध्ये अग्नीवीर योजना रद्द करण्यासह अन्य आश्वासनांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लखनौमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
उत्तर प्रदेशात गेल्या आठ वर्षांमध्ये असे अनेक माफिया योगी सरकारने धुळीस मिळवले आहेत. नुकत्याच मुख्तार अन्सारी या माफियाच्या झालेल्या नैसर्गिक मृत्यूमुळे योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत आले. कारण, मुख्तार अन्सारीचा मृत्यू जरी नैसर्गिक असला, तरीदेखील त्याच्या गुन्ह्यांच्या सर्व फाईल्स काढून, योगी सरकारने एकेकाळच्या या बलाढ्य माफियास शब्दशः गुडघ्यावर आणले होते.
उत्तर प्रदेशातील एकेकाळचा माफिया तथा कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा बांदा तुरुंगात हृदविकाराचा झटका आल्याने मृत्यु झाला. दि ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता गाझीपूर येथील कालीबाग येथील दफनभूमीत मृतदेहास दफन करण्यात आले. यावेळी गुंड अन्सारीच्या अंत्यदर्शनास समाजवादी पार्टीचे नेते पोहोचले होते.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसपेक्षाही समाजवादी पक्षासाठी आघाडी गरजेची होती. अलीकडच्या काळात समाजवादी पक्षाला मुस्लीम मतपेढीस कायम ठेवणे अखिलेश यांना अवघड जाऊ लागले आहे. ही मतपेढी काँग्रेस आणि बसपाकडे वळू शकली असती. आता काँग्रेसशी हातमिळवणी करून अखिलेश यांनी पुन्हा एकदा या मतपेढीमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिरांचे लोकापर्ण दि. २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. दरम्यान भारतातील काही डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, त्यांचा देव पीडीए आहे. म्हणजे मागास, दलित आणि अल्पसंख्याक.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशात राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदू धर्माविषयी सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी गरळ ओकली आहे. हिंदू धर्म हा धोका असून लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग आहे. असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. हिंदू संघटनांनी प्रत्युत्तर देत अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, "कोणीही हिंदुत्वाला कमकुवत करू शकत नाही आणि हिंदुत्व पुसूनही टाकू शकत नाही."
इंडी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी (10 डिसेंबर) ट्विट करत ही माहिती दिली. मात्र, 17 डिसेंबरपासून बैठक का पुढे ढकलण्यात आली, याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव यांनी 17 डिसेंबर रोजी विरोधी गटाची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
निवडणूक जिंकल्यानंतर परदेशात सुट्टी घालवायला जाण्याची पद्धत भाजपमध्ये नाही. त्याउलट एक निवडणूक झाली की, आगामी निवडणुकीसाठी पक्षसंघटनेस सज्ज करण्यासाठी भाजप नेते लगोलग कामाला लागतात. कोणतीही निवडणूक पूर्ण क्षमतेने लढण्याची भाजपची सवयच. त्यामुळे पंतप्रधान मोदी म्हणाले त्याप्रमाणे, २०२४ साली विजयाची हॅटट्रिक साधण्याची भाजपची पूर्ण तयारी झाली आहे.
"इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांसोबत जागावाटप न केल्यामुळे काँग्रेसला तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केले. त्या रविवारी जाहीर करण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत होत्या.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत, आघाडीचे कोणतेही काम होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमार स्पष्टपणे सांगतात की, सध्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा नाही, किंवा कोणतेही काम सुरू नाही, कारण काँग्रेसचे नेते पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. या आघाडीबाबत कोणतीही चर्चा निवडणुका संपल्यानंतरच होईल.नितीश कुमार यांनी स्वत:ला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हटले. दि. २ नोव्हेंबर २०२३ पाटणा येथे सीपीआय आणि डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या रॅल
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या एका वक्तव्यामुळे इंडी आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंडी आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात मध्यप्रदेशातील जागांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे.
२३ जून २०२३ ला बिहारच्या राजधानीमध्ये देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे पोस्टर्स लागले होते. कारण होत, पाटनामध्ये होणारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक. बैठक झाली केजरीवाल रुसले. पण पुढच्या बैठकीची तारीख ठरली. यानंतर एका महिन्याच्या आत विरोधी आघाडीची दुसरी बैठक बंगलोरमध्ये पार पडली, या बैठकीत या विरोधी आघाडीचे नावं पण ठरले, इंडी आघाडी. यानंतर अवघ्या दीड महिन्यात इंडी आघाडीची तिसरी बैठक पार पडली, मुंबईत. या बैठकीत विशेष काही घडलं नाही. पण एक समन्वय समिती जाहीर झाली.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताच इंडी आघाडीत वाद सुरु झाले आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेसला धोकेबाज म्हटले आहे. ते म्हणाले की, "मध्य प्रदेशात समाजवादी पक्षाला जागा देण्याचे आश्वासन देऊनही काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे. इंडी आघाडी राज्यात विधानसभा स्तरावर युती करणार नाही हे आम्हाला माहीत असते तर आम्ही आमच्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले नसते आणि त्यांच्या नेत्यांचे फोनही घेतले नसते."
राहुल यांना वायनाडमधून निवडून आणण्यास डाव्या पक्षांनी असमर्थता दर्शविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यापुढे पुन्हा एकदा मतदारसंघ बदलण्याची वेळ येऊ शकते. या पाच राज्यांचे निकाल काहीही लागोत, जानेवारी महिन्यात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशातील वातावरण झपाट्याने बदलणार, या शंका नाही.
भाजपबरोबर एकट्याने लढा देण्याची ताकद कोणत्याही विरोधी पक्षात नाही आणि ‘इंडिया’ आघाडी बनण्यामागचे खरे कारणही हेच आहे की, भाजपला शह देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागले आहे. फोटोसाठी हे परस्परविरोधी पक्ष एकत्र आले असले, तरी त्यांच्यात एकमेकांबद्दल अविश्वास कायमच आहे. दुसर्याच्या जागांवर डल्ला मारण्याची संधी कोणताच पक्ष सोडेल, असे दिसत नाही.
सनातन हिंदू धर्मास शिव्या देणे, हाच एकमेव अजेंडा विरोधी पक्षांच्या घमंडिया आघाडीचा असल्याची टिका केंद्रीय शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी केली आहे.
मुंबईतील विरोधी पक्षांची आघाडी I.N.D.I.A. च्या स्टेजवर कपिल सिब्बल पोहोचल्यावर उपस्थित काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली. मुळात सिब्बल हे माजी काँग्रेसी आहेत. आणि सध्या ते समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत. दुसरीकडे, 'बिन बुलाए मेहमान' म्हणून त्यांचे आगमन झाले आणि तेही थेट मंचावर.त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली. म्हणून परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक नेत्यांना बोलणी करावी लागली.
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले आणि भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे पुन्हा आझम खान यांना जेलवारी करावी लागणार आहे. आझम खान यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याचे आमदारपदही गेले आणि रामपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. रामपूरच्या MP-MLA न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान शहजाद नगरशी संबंधित आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक एकत्र येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र आता विरोधी पक्षामध्ये पक्ष सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. आता समाजवादी पक्षाचे आमदार आणि महत्त्वाचे नेते दारासिंह चौहान यांनी पक्षाला मोठा धक्का देत राजीनामा दिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडला आणि सपामध्ये प्रवेश केला होता.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे ११ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. विमानतळावरून ते थेट मातोश्रीवर जाऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे. उद्धव यांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवार यांच्या घरीही जाऊन भाजपविरोधात विरोधकांना एकत्र करण्याबाबत चर्चा नितीश कुमार करणार आहेत.
उत्तर प्रदेशात मारला गेलेला माफिया अतिक अहमदशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राजकुमार म्हणत आहेत की, अतिक अहमदला शहीद घोषित करा.तसेच अतिक अहमद यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील राजकुमार यांनी केली आहे. त्याचबरोबर राजकुमार म्हणाले की, अतिक अहमद यांनी हौतात्म्य पत्करले आहे, त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर तिरंगा ठेवायला हवा होता. योगी सरकारने अतिक अहमदची हत्या केल्याचा आरोप ही राजकुमार यांनी केला आहे. मुलायमसिंह यादव यांना जर प
माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार मोहम्मद गुलाम यांच्या एन्काऊंटरवरून राजकारण सुरू झाले आहे. १३ एप्रिल रोजी यूपी एसटीएफने त्या दोघाचा ही एन्काऊंटर केला. मात्र सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या एन्काऊंटरला फेक असल्याचे म्हणटले आहे. तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मावरून एन्काऊंटर केले जात असल्याचे म्हणटले आहे.
ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्या पक्षांनी ते आगामी निवडणुका स्वतंत्ररित्या लढविण्याची घोषणा करुन अप्रत्यक्षरित्या काँग्रेसचे ‘हात’ दाखवून अवलक्षणच केले. त्यातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव शुक्रवार, दि. १७ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या दौर्यावर जाणार असून यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ते भेट घेतील. इकडे उत्तर प्रदेश सोडून सपा शनिवार, दि. १८ मार्चपासून कोलकातामध्ये पक्षाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करत आहे. यामध्ये विविध राज्यांतील विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी
उत्तर प्रदेशातील विधानसभेत उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अखिलेश यांनी राज्य सरकारकडे उत्तर मागितले आणि सीएम योगींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आम्ही माफियांच्या विरोधात आहोत, त्यांना मातीत मिसळू.आम्ही कोणत्याही माफियाला सोडणार नाही. तसेच योगी म्हणाले की, सपाने अतिक अहमदला प्रोत्साहन दिले. गुन्हेगाराला खासदार करा आणि मग तमाशा करा, अशी टीका ही योगीनी अखिलेश यादव यांच्यावर केली. तसेच राजू पाल हत्याकांडात अतिक अहमद दोषी असून, सपाने त्याला आमदार करून पदोन्नती दिली.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशाचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी योगींनी एक पंचवार्षिक धोरण आखले आहे. या धोरणातून उत्तरप्रदेश मधील पर्यटन क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या माहिती अर्जावर नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीतून महाराष्ट्रात तब्बल २ लाख, ४४ हजार शासकीय पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यात गृह विभागाच्या सर्वाधिक ४५ हजार पदांचा समावेश आहे
उत्तर प्रदेश सरकारला मदरशांची सच्चाई समजली आणि कोणत्याही मदरशाने आम्ही मानदंडांची पूर्तता करत असल्याचे म्हटले तरी सरकारने त्यांचा पूर्ण तपास करण्याचे ठरवले, तर आता मात्र सरकारने कोणत्याही नव्या मदरशाला अनुदान न देण्याचाच निर्णय घेतला.
कधीकाळी नरेंद्र मोदींविरोधात एल्गार पुकारून अखिलेश आणि मायावती एकत्र आले. मात्र, पुढे सुत काय जुळलं नाही. या बुआ-बबुआंना मोदींनी पराभवाची धूळ चारली. आताही योगींनी सलग दुसर्यांदा विजय मिळवून त्यांना आस्मान दाखवले. मात्र, सुधारतील ते अखिलेश भैय्या कसले
मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर कल चाचणीमध्ये (एक्झिट पोल) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपकडे सत्तेचा काटा सरकताना ‘एक्झिट पोल’मध्ये दिसून आले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाकडे सत्तेचा लंबक झुकल्याचे दिसून येत असून पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला यशाने पुन्हा हुलकावणीच दिल्याचे चित्र आहे.
कॅप्टन अमरींदर सिंह यांच्या नाराजीनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात केलेली ढवळाढवळ यामुळे काँग्रेसच्या हातातून पंजाब निसटून गेलेलं आहे.2022 Vidhan Sabha election results
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकणांचे निकाल येत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्ता राखणार हे आता स्पष्टच होते आहे. या निकालांनी सर्वच भाजप विरोधकांना घाम फोडल्याचे दिसून आले आहे, यातही शिवसेना नेते संजय राऊत पिछाडीवर नाहीत
अहमदाबाद येथील बॉमस्फोटातील अतिरेकी समाजवादी पक्षाचा प्रचार करत असल्याचा घणाघाती आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी लखमापूर खेरी येथील प्रचार सभेत केला
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ते आहेत: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर. सर्वांचे लक्ष यूपी निवडणूक २०२२ च्या निकालाकडे लागले आहे, ज्याने लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवले आहेत. राज्यात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला आणि शेवटच्या टप्प्यात ७ मार्चला मतदान होणार आहे. यापूर्वी आलेल्या एका सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात पुनरागमन करेल, असे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेशच्या इतिहासात योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मुख्यमंत्री अद्याप झाला नसल्याचे म्हटले आहे. सीएम योगींनी ना त्यांचे संस्कार सोडले आहेत ना स्वतचे भविष्य चांगले बनवण्याची चिंता त्यांनी सोडली आहे. अपर्णा म्हणाली, “मी हिंदू राष्ट्रात हिंदी भाषिक आहे. राममंदिर बांधले जाणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी मी दानही दिले होते.”
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पात्रा म्हणाले, "संपूर्ण देश उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस साजरा करत असताना, अखिलेश यादव यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पाकिस्तान हा भारताचा शत्रू नाही. हे लाजीरवाणे आहे.'