हिंदू धर्माविषयी पुन्हा बरळला सपा नेता! "हिंदू धर्माचा धोका नसून तो लोकांना..."
26-Dec-2023
Total Views | 87
नवी दिल्ली : स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशात राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदू धर्माविषयी सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी गरळ ओकली आहे. हिंदू धर्म हा धोका असून लोकांना मूर्ख बनवण्याचा उद्योग आहे. असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. हिंदू संघटनांनी प्रत्युत्तर देत अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, "कोणीही हिंदुत्वाला कमकुवत करू शकत नाही आणि हिंदुत्व पुसूनही टाकू शकत नाही."
सपा नेता स्वामी प्रसाद मौर्य ने एक बार फिर अपने मुखिया अखिलेश यादव के इशारे पर हिन्दू धर्म को लेकर जहर उगला है, जो इनके नेता और इनकी पार्टी के दोहरे चरित्र को प्रदर्शित करता हैI
एक तरफ अखिलेश यादव सनातनी लोगों के सामने स्वीकार करते हैं कि स्वामी प्रसाद मौर्य गलत बयानबाजी करते… pic.twitter.com/Dnl8XG3vDr
अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनीही स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. चक्रपाणी महाराज यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य रामचरितमानस, सनातन आणि हिंदूंवर नकारात्मक टिप्पणी करत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री योगी, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची वेळ आली आहे. स्वामी बोलण्याच्या पातळीवर झुकले आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पापांचे भांडे भरल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. आता हे भांडे तोडण्याची गरज आहे. असा हल्लाबोल चक्रपाणी महाराज यांनी केला आहे.