सिद्धूंच्या नादी लागून पंजाब काँग्रेसचा सुपडा साफ! 'आप'चा मुख्यमंत्री होणार!

    10-Mar-2022
Total Views | 111

 Punjavb


2022 Vidhan Sabha election results


नवी दिल्ली : कॅप्टन अमरींदर सिंह यांच्या नाराजीनंतर नवज्योत सिंह सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात केलेली ढवळाढवळ यामुळे काँग्रेसच्या हातातून पंजाब निसटून गेलेलं आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये ११७ पैकी तब्बल ८४ जागांवर आघाडी घेत जवळपास सत्तास्थापनेची तयारीही केली आहे. राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी वेळ मागून घेतला आहे. पंजाबमध्ये आपचा अभूतपूर्व असा जल्लोष सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या या सगळ्या राजकीय मुसंडीपुढे काँग्रेसने नांगी टाकलेली आहे. 'एक मौका आप नू', असे म्हणत आप कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची तयारी केलेली आहे.

नवज्योत सिंह सिद्धू मात्र, यांच्यासह अपेक्षेप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा पाडाव केला आहे. ते सध्या पीछाडीवर आहेत. विशेष म्हणजे कॅप्टन अमरींदर सिंहही पिछाडीवर असल्याचते पहायला मिळत आहे. आपच्या उमेदवारांनी आघाडी घेत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात केली आहे. प्रथमच दिल्लीच्या बाहेर सत्ता स्थापन करण्याचा बहुमान मिळाला आहे.

देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या आणि देशातील राजकारणाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अचूक वेध देणार्‍या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात पहिल्यांदाच जनतेने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री कायम ठेवला आहे. भाजप युपीमध्ये १६५ जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेकडे कूच करत आहे. गोरखपूर मतदार संघातून स्वतः योगी आदित्यनाथ साडेपाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.


तुष्टीकरण, जातीयवादाला बगल देत युपीमध्ये मतदारांनी विकासाला मतदान केले आहे. योगींच्या युपी व्हीजनला मतदारांनी साथ दिली आहे. सकाळी ९.३० वाजतेपर्यंत अखिलेश यादव यांच्या सपाला फक्त ८५ जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात मैदानही राखता आलेलं नाही. काँग्रेस केवळ तीन जागांवर आघाडीवर आहे. प्रियांका गांधींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊनही त्यांना करीश्मा दाखवता आलेला नाही.
उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या पाचही राज्यांच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे. साधारणपणे दुपारच्या सुमारास पाचही राज्यांचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. यामध्ये उत्तर प्रदेशच्या 403, पंजाबच्या 117, उत्तराखंडच्या 70, मणिपूर आणि गोव्याच्या अनुक्रमे 60 व 40 जागांचा निकाल हाती येणार आहे.

मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर कल चाचणीमध्ये (एक्झिट पोल) उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळणार, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपकडे सत्तेचा काटा सरकताना ‘एक्झिट पोल’मध्ये दिसून आले आहे. त्याचवेळी पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाकडे सत्तेचा लंबक झुकल्याचे दिसून येत असून पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला यशाने पुन्हा हुलकावणीच दिल्याचे चित्र आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121