‘ऑपरेशन सिंदूर’चे पुरावे यावेळी सीमेपलीकडूनच आले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    27-May-2025   
Total Views | 23
Evidence of
नवी दिल्ली  : विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून त्याविषयी कोणासही पुरावे मागण्याची जागा ठेवली नसल्याचा टोला विरोधी पक्षांना लगावला.

जेव्हा पाकिस्तान आपल्याला थेट युद्धात हरवू शकला नाही, तेव्हा त्याने आपल्या देशात दहशतवादी पाठवायला सुरुवात केली. याचा अर्थ त्यांनी प्रॉक्सी युद्धाचा अवलंब केला. आजपर्यंत आपण ज्याला प्रॉक्सी वॉर म्हणत होतो, ६ मे नंतर आपण पाहिलेल्या दृश्यांनंतर, आता आपण त्याला प्रॉक्सी वॉर म्हणण्याची चूक करू शकत नाही. भारताने ज्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यांना पाक लष्कराने सन्मान देऊन त्यांच्या शवपेट्यांवर पाकचे झेंडे लावले. यामुळे पाकचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाला. भारताने निर्णायक कारवाई करून अवघ्या २२ मिनिटात ९ दहशतवादी अड्डे आणि त्यातील शेकडो दहशतवाद्यांना नष्ट केले. यावेळी सर्व काही कॅमेऱ्यांसमोर करण्यात आले, जेणेकरून देशात कोणीही पुरावा मागू नये. यावेळी भारतास कोणताही पुरावा देण्याची गरज नसून दुसऱ्या बाजूचे लोकच पुरावे देत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सिंधू जल कराराचा संदर्भ देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही आमच्या कामात गुंतलो होतो, प्रगतीच्या मार्गावर आहोत, आम्ही सर्वांचे कल्याण करतो आणि संकटाच्या वेळी मदत देखील करतो, परंतु त्या बदल्यात रक्ताच्या नद्या वाहतात. १९६० मध्ये झालेल्या सिंधू पाणी कराराच्या तपशीलात गेल्यास धक्कादायक माहिती समोर येते. जम्मू आणि काश्मीरमधील इतर नद्यांवर बांधलेल्या धरणांची स्वच्छता न करणे आणि त्यांचे दरवाजेही मन उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी ही धरणे कधीही १०० टक्के भरली नाहीत आणि त्यांची क्षमता कमी होत गेली. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. भारताने अद्याप तरी फारसे काही केलेले नाही; तरीदेखील पाकला घाम फुटल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121