नवी दिल्ली : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक लष्करी अभियान नाही, तर बदलत्या भारताचे उदाहरण आहे. आपल्या सैनिकांनी दहशतवादी तळांचा अचूक नाश केला. हा त्यांच्या धैर्याचा आणि 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्रांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दि. २५ मे रोजी मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाची प्रशंसा केली. या लष्करी मोहिमेत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करून त्यांचा नाश केला. या कारवाईत 'मेड इन इंडिया' शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञानाचा मोठा वाटा होता. असे मत त्यांनी व्यक्त केले.
पंतप्रधानांनी 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमाचा उल्लेख करताना सांगितले की, या मोहिमेत भारतीय अभियंते, तंत्रज्ञ आणि सैनिकांचे परिश्रम सामील आहेत. या यशामुळे देशात 'वोकल फॉर लोकल' चळवळीला चालना मिळाली आहे. काही ठिकाणी तर नवजात बालकांना ‘सिंदूर’ असे नाव देखील जात आहे, ह्या वरून ऑपरेशन सिंदूरच्या यशाची जाणीव होते.
या मोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 'तिरंगा यात्रा' काढण्यात आल्या. ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोदी म्हणाले, "हे अभियान दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्याला नवीन वळण देणारे ठरले आहे."