‘जय श्रीराम’ सर, अयोध्या नगरीच्या महर्षी वाल्मिकी विमानतळावर एका पन्नाशीच्या पुढे झुकलेल्या CISF च्या कॉन्स्ट्सेबलने स्वागत कक्षावर हसत स्वागत केले, ओळख पत्र पाहिल्यावर परत जय श्रीराम म्हणत आम्हाला पुढे रवाना केले. नुकतेच महाकुंभ मधे गंगा स्नान करून आम्ही रामलल्लाचे दर्शन करून आलो होतो….अयोध्येच्या विमानतळावर स्वागत कक्षात आणि वेटिंग एरियामध्ये सगळीकडे रामायणामधील प्रसंगावर आधारित मोठे मोठे भित्तीचित्र लागले आहेत. प्रत्येक चित्रात श्री रामाचे जीवनचरित वर्णित आहे. आणखीन थोड्या वेळाने विमान हवेत झेपावले आणि विमानात रामनामाचा जोरदार गजर झाला. अंगावर अक्षरशः आजकाल ते गुज बंप म्हणतात तसे काहीतरी आले. शासन जर धर्माचा सम्मान करत असेल तर खाली ते झिरपायला वेळ लागत नाही.
मला १९९२ पर्यंत माझ्या रक्ताच्या अनेक सुहृदानी घेतलेले कष्ट आठवले, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्या सारखे वाटले. प्राणाची पर्वा न करता केवळ जय श्रीराम म्हणत या नगरीत ते आले होते आणि कारसेवा करून गेले होते.
खरंच 'परिंदा भी पर नाही मार सकता...' पासून या राम नामाच्या जय घोषापर्यंत शरयू नदीतून कितीच पाणी वाहत गेले असेल राम जाणे . एके काळच्या हिंदुद्वेष्ट्या सरकारने रघुकुलाचेच अस्तित्व नाकारले होते . श्री रामांना वनवास आणि बाबरचे गुणगान असे का व्हाव अस सारखं राहून राहून वाटत आणि हे समजायचे असेल तर आपल्याला गंगा जमुनी तहजीब समजावून घ्यावी लागेल.
तहजीब म्हणजे ढोबळमानाने जीवनपद्धती किंवा संस्कृती. मागील काही शतकात तुर्क, मंगोल अरब यांची शतकानुशतके आक्रमणे झाली. ती आक्रमणे केवळ भूमीवर नव्हती किंवा त्यापेक्षा जास्त ती या सनातन संस्कृतीवर जास्त होती. या आक्रमकांनी आपल्या राजधान्या गंगा यमुनेच्या किनाऱ्यावर म्हणजे आग्रा दिल्ली येथे वसवल्या आणि द्वेषाची नवीन बीज रोवली ती ही गंगा जमुनी तहजीब..,याना कधीच सह अस्तित्त्व मान्य नव्हत. एक तर हिंदू म्हणून जगायचं असेल तर जिझिया कर भरावा किव्हा बळजबरीने धर्मांतरित व्हा सांगणारी हीच ती तहजीब. आपल्या सनातन ला बदनाम करून हिंदू धर्माला देतील तेवढ्या शिव्या देणारी लोक यांच तहजीब मधून न्हाऊन निघाली असतात. यांच्या मधे औरंगजेब हा सतत तासबीड जाणारा एक सुफी संत असतो केवळ टोप्या विकून गुजराण तो करत असतो तो शंभू राजांवर चाल करायला नाही तर राज्य विस्ताराला आलेला असतो…
याच विचारांची बुद्धीजीवी मागील काही वर्षात अनेक क्षेत्रात शिरलीत आणि पद्धतशीर पणे त्यांनी नाटक कला राजकारण या क्षेत्रात या विचारसरणीचा प्रसार केला. दीवार या चित्रपटातला अमिताभ आठवा आपल्या आईच्या हातातून देवाच्या प्रसादाला सुद्धा नाही म्हणणारा नायक मात्र दंडाला ७८६ चा बिल्ला मोठ्या प्रेमाने बांधतो आणि पुढे तोच बिल्ला त्याचे प्राण वाचवितो. अजून एक नायक आपल्या खऱ्या जीवनात हिंदू नायिकेशी दुसर लग्न करतो, आणि पोराचे नाव ठेवायला त्याला तैमूर सोडून दुसरा नाव आठवत नाही खर पाहता त्याच पहिल लग्न सुद्धा हिंदू नायिकेशीच … सारच अतर्क्य….
बर आपल्या शेजारी देशाने बरे त्यांच्या क्षेपणास्त्रांची नावे शाहीन, बाबर, घौरी ठेवली आहेत कारण अजून आपले शत्रू कोण हे त्यांच्या डोक्यात पक्के असावे.
खरतर तहजीब सांगणारे नेहमी एकांगीच असतात, औरंगजेबचा भाऊ दारा शुकोह याने भगवद्गीता, उपनिषद फारसी मधे भाषांतरित केली हे कोणी सांगणार नाही . “मानुस हो तो वही रसखान, बस ब्रज गोकुळ के गाव के ग्वारन “ लिहिणारे रसखान याना आवडत नाहीत त्यापेक्षा याना पाकीजा, मुघल-ए-आझम, जोधा अकबरचे ते भव्य सेट्स आवडतात…एक काश्मीर फाईल चित्रपट आला तर असे घडलेच नाही, हे खोट आहे ओरडायला ही टोळधाड तयारच असते…..आणि हीच आहे ती गंगा जमुनी तहजीब केवळ हिंदू द्वेषाने भरलेली….
दासगणू महाराज म्हणतात अगणित करावे पुण्य तेव्हाच येथे होते जनन.
काही मागच्या जन्मी पुण्य गाठी असावे म्हणून या भरत भूमीवर आपला जन्म झाला आहे. कृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली ती यमुना आणि सदाशिवच्या सानिध्यात पावन झालेली गंगा, यांचा संगम म्हणजे हरिहराचा संगम आहे, यांच्या संगमाची अनुभूती आली की गुप्त ज्ञान सरस्वतीच्या रूपात मिळेलच यात शंका नाही. आवश्यक आहे ते फक्त आपली धर्मश्रद्धा कायम ठेवण्याची.
धर्माभिमान कमी झाला की आपला धर्म थोतांड वाटतो आणि यासाठी पद्धतशीर पणे आपल्या श्रद्धा स्थानावर आघात करून ते खिळखिळे करायचे प्रयत्न चालू आहेत . पण आपण सुद्धा आपल्याला तहजीब नाहीतर जीवनपद्धती जगायची आहे हे पक्के ध्यानी ठेवायला हवे .
माऊली ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायात म्हणतात,
“आपणया उचिता । स्वधर्म राहाटता ।
जे पावे ते निवांता । साहोनी जावे ।।”
तेव्हा कितीही अपप्रचार झाला तरी आपली संस्कृती आपला सनातन धर्म श्रेष्ठ आहे हे विसरून नये. दोष असतील तर ते झडतील. हा अक्षुण्ण अफुट निर्मळ संस्कृती प्रवाह आहे यात आपण सामील व्हावे की बाहेर बसून गोटे मारावे हे ज्याचे त्याने ठरावावे..,
जयदीप देशपांडे
९६५७७२२३१२