उज्ज्वल भविष्यासाठी स्वच्छ शहरे

Total Views | 10
उज्ज्वल भविष्यासाठी स्वच्छ शहरे

आज देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगातील महानगरपालिका क्षेत्रांत 2.0 अब्ज मेट्रिक टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. वर्ष 2050 पर्यंत हा आकडा 73 टक्क्यांनी वाढून 3.88 अब्ज मेट्रिक टन होईल. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील शहरांसाठी या वाढीव कचर्‍याचे व्यवस्थापन करणे, हे एक मोठे आव्हान आहे.



जागतिक स्तरावर आजही 23 टक्के कचरा गोळा केला जात नाही आणि 33 टक्के कचरा उघड्या मोकळ्या जागांमध्ये टाकला जातो. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या आणखी तीव्र आहे. अशा देशांमध्ये 60 टक्के घनकचरा गोळा केला जात नाही आणि 93 टक्के कचरा चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापित केला जातो. म्हणजेच, एकतर रस्त्यांवर टाकला जातो, पुरला जातो किंवा जलमार्गांमध्ये टाकला जातो.

आश्चर्याची बाब म्हणजे, अमेरिका हा जगातील इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा जास्त कचरा निर्माण करतो. दररोज प्रतिव्यक्ती 4.5 पौंड (दोन किलो) घनकचरा निर्माण होतो, ज्यापैकी 55 टक्के कचरा निवासी कचरा म्हणून गणला जातो. लीड्स विद्यापीठाच्या अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले की, भारत दरवर्षी अंदाजे 5.8 दशलक्ष टन प्लास्टिक जाळतो आणि अतिरिक्त 3.5 दशलक्ष टन कचरा पर्यावरणात मिसळला जातो. 2003 मध्ये कामिकात्सु ही 2020 पर्यंत ‘शून्य कचरा’ उद्दिष्ट घोषित करणारी जपानमधील पहिली नगरपालिका ठरली. वर्ष 2016 पासून या शहराने 45-श्रेणी वर्गीकरण प्रणाली राखली आहे. कामिकात्सुमध्ये ‘शून्य कचरा केंद्र’ चालवणार्‍या तरुण नेत्या मोमोना ओत्सुका यांनाच याचे श्रेय जाते. 2020 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’कचरामुक्त स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले होते. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत भारत सरकारच्या ’स्वच्छ भारत अभियान’ने महत्त्वाची भूमिका बजावली.

जागतिक तापमानात होत असलेली अभूतपूर्व वाढ आणि त्याचे प्रतिकूल हवामानबदलाचे परिणाम पाहता, कचरा कमी करण्यात आणि पुनर्वापर करण्यात जगाने पुढाकार घेतला आहे. असे अनेक देश आहेत, जे त्यांच्या कचर्‍याचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी हरित उपक्रम तसेच शाश्वत धोरणांवर सक्रियपणे कार्यरत आहेत. चांगले जनजागृती दृष्टिकोन राबवून आणि प्लास्टिक कचरा कमी करून भारतासह अनेक जगभरातील देश कचर्‍याचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करत आहेत.

जर्मनी हा देश अनिवार्य कचरा वर्गीकरणासह प्रभावी उपाययोजनांद्वारे सुमारे 67 टक्के कचर्‍याचा पुनर्वापर करतो. जर्मनीने 2019 मध्ये पॅकेजिंग कायदा लागू केला, ज्याचा उद्देश पॅकेजिंग कमी करणे होता. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि कचरा कमी करण्यासाठी आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी स्वीडन हा देश आघाडीवर आहे. स्वीडनने 1940च्या दशकात एक प्रभावी कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमामुळे देशात उत्पादित होणार्‍या सुमारे 52 टक्के कचर्‍याचे ऊर्जेत रूपांतर होते, तर 47 टक्के कचर्‍याचा पुनर्वापर केला जातो. स्वीडनने एक नावीन्यपूर्ण भूमिगत कचरा संकलन प्रणालीदेखील लागू केली आहे, जी रहिवाशांना नियुक्त केलेल्या ठिकाणी कचरा टाकण्याची परवानगी देते, जिथून तो अधिक कार्यक्षमतेने इन्सिनरेटरमध्ये नेला जातो. जपानने कचरा कमी करण्यासाठी अनेक नवीन धोरणे स्वीकारली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे 80 टक्के नागरिकांनी कचरा दहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला आहे. 80 टक्के प्लास्टिक पुनर्वापर दरासह जपान हा देश सातत्याने कचरा उत्पादन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ब्राझीलमध्ये निर्माण होणार्‍या सुमारे 70 टक्के कचर्‍याचा पुनर्वापर केला जातो. ब्राझीलमध्ये एक अशी व्यवस्था आहे, जी पुनर्वापर योजनेत सहभाग घेणार्‍या लोकांना प्रोत्साहन देते. नागरिकांना त्यांचा कचरा नियुक्त केंद्रांवर घेऊन जायचा आहे आणि त्याबदल्यात त्यांना टोकन दिले जाते, जे ते वाहतुकीसाठी किंवा अन्न खरेदी करण्यासाठी वापरू शकतात. ही केवळ काही प्रभावी कचरा व्यवस्थापनाची उदाहरणे आहेत. जे देश अधिक शाश्वत जीवन जगण्याचा दृष्टिकोन स्वीकारू इच्छितात, त्यांच्यासाठी प्रभावी कचरा व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कचर्‍याचे प्रमाण कमी करणे आणि पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करून हे देश उज्ज्वल भविष्यासाठी आणि हरित प्रदेश पट्टे वाढविण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121