पेपरफुटीसाठी आता दहा वर्षांची शिक्षा

एक कोटींचा दंड; स्पर्धापरीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचे विधेयक विधानसभेत सादर

    06-Jul-2024
Total Views |

Shambhuraj desai
 मुंबई : पेपरफुटीच्या घटना वाढू लागल्यामुळे त्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धापरीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचे विधेयक शुक्रवार, दि. 5 जुलै रोजी विधानसभेत सादर करण्यात आले. पेपरफुटी करणार्‍याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक कोटी रुपये दंडांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले.
 
स्पर्धापरीक्षेत कोणत्याही उमेदवाराचा, स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या पाठिंब्याने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग अथवा परीक्षेत कोणत्याही लिखित, अलिखित, नक्कल केलेल्या, मुद्रित केलेल्या साहित्याचा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळविलेल्या साहित्याचा बेकायदेशीर वापर करणे अथवा परीक्षेमध्ये कोणतीही अनुचित व इतर अनधिकृत मदत घेणे, कोणतेही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक साधन किंवा उपकरण इत्यादींचा वापर करणारा शिक्षेस पात्र ठरेल.
 
या अधिनियमाखालील सर्व अपराध हे दखलपात्र, अजामीनपात्र असतील. त्यासाठीची शिक्षा तीन ते दहा वर्षांपर्यंत असेल. त्याचप्रमाणे, दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडासही तो पात्र ठरेल. त्यात कसूर केल्यास भारतीय न्याय संहिता, 2023च्या तरतुदींनुसार कारावासाची अतिरिक्त शिक्षा देण्यात येईल, असे विधेयकात नमूद करण्यात आले आहे.
 
तपासासाठी उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी
स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराचा तपास पोलीस उपअधीक्षक किंवा साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकार्‍यांमार्फतच होणार आहे. त्याचप्रमाणे, या प्रकरणांचा तपास कोणत्याही राज्य अन्वेषण अभिकरणाकडे सोपविण्याचा अधिकार राज्य शासनाला असेल, असेही विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
  
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121