युवा संशोधकांसाठी 'प्रबोधिनी पाठ्यवृत्ती कार्यक्रम'

    23-Jul-2024
Total Views | 51

Rambhau Mhalgi Prabodhini

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rambhau Mhalgi Prabodhini News) 
प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या क्षेत्रात काम करणारी नावाजलेली संस्था 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी' तर्फे एक 'पाठ्यवृत्ती' यावर्षी दिली जात आहे. पाठ्यवृत्तीसाठी निवडलेल्या संशोधकांना राजकीय, सामाजिक-आर्थिक, आणि नीती-सुशासन या क्षेत्राशी संबंधित विषयांवर काम करायचे आहे. या पाठ्यवृत्तीचा उद्देश हा संशोधकांना नेतृत्व व्यवस्थापन, राजकारण, सुशासन, लोकशाही इत्यादी क्षेत्रात चांगले काम करण्याचा अनुभव मिळावा, हा आहे. या पाठ्यवृत्तीसाठी मणिपाल एज्युकेशन आणि मेडिकल ग्रुप यांचा आर्थिक सहभाग लाभला आहे.

हे वाचलंत का? : बजेट न वाचताच विरोधकांची घोषणाबाजी! प्रतिक्रियाही आधीच ठरलेली

पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार हे २३ ते ३५ या वयोगटातले असावेत. त्यांनी पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के मार्कानी उत्तीर्ण केलेली असावी. काही प्रमाणात सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा. ही पाठ्यवृत्ती एकूण १२ महिन्यांसाठी असेल. सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ हा पाठ्यवृत्तीचा कालावधी असून एकूण ३५ जणांना पाठ्यवृत्ती दिली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यांला किंवा संशोधकाला रुपये २२ हजार दर महिना दिले जातील.

निवडलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी एक तज्ञ असतील. उमेदवारांचे क्षमता संवर्धन करण्यासाठी पाठ्यवृत्ती कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक पायाभूत प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाईल. पाठ्यवृत्ती संपायच्या वेळेस संशोधन करत असलेल्या विषयावर एक शोधनिबंध लिहून प्रबोधिनीला द्यावा लागेल. पाठ्यवृत्ती यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि मणिपाल ग्रुप यांच्यातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यक्रमाद्वारे संशोधक विद्यार्थी पुढे जाऊन देशाच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पाठ्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२४ आहे. अधिक माहितीसाठी https://iidl.org.in/fellowship/
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121