गरीब आदिवासींची दिशाभूल करून धर्मांतर केलं जातंय!

आमदार बाबुलाल खराडी यांचे सूचक विधान

    15-Jul-2024
Total Views | 32

Babulal Kharadi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Conversion of Adivasi)
'शिक्षण, रोजगार आणि वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली गरीब आदिवासींची दिशाभूल करून धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे.', असे सूचक विधान राजस्थानचे आमदार बाबुलाल खराडी यांनी केले आहे. डुंगरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

हे वाचलंत का? : समस्या सोडवण्यासाठी संकल्पबद्ध समाज घडवण्याची गरज : शांताक्का

बाबुलाल खराडी पुढे म्हणाले, धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती आदिवासी राहत नाही, त्यामुळे त्याला एसटी आरक्षणासह इतर सवलती मिळत नाहीत. त्याकरीता डी-लिस्टिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. धर्मांतर हा चिंतेचा विषय आहे, पण ते का घडते याचाही विचार करायला हवा.

वनवासी भागातील मुले विकण्याच्या घटनेबाबत ते म्हणाले की, हे सर्व मागील सरकारच्या काळात घडले. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. मुलांच्या तस्करीत गुंतलेल्या टोळ्या सक्रिय आहेत, ज्या पालकांना फसवून मुलांना पळवून नेतात. आता विद्यमान सरकार हे होऊ देणार नाही. लहान मुलांच्या तस्करीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.


अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121