दिल्लीत होणार ‘कालजयी सावरकर’चे प्रदर्शन

- भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचा पुढाकार

    24-Feb-2023
Total Views | 98
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्ली येथे २६ फेब्रुवारी रोजी साप्ताहिक विवेकनिर्मित कालजयी सावरकर हा चरित्रपट दाखविण्यात येणार आहे.
 
Kaljayi Savarkar 
 
देशाची राजधानी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माय होम इंडियाचे संस्थापक आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी साप्ताहिक विवेकनिर्मित कालजयी सावरकर या चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी सुनील देवधर हे कालजयी सावरकर या विषयावर उपस्थितांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या व्यक्तिमत्त्वांचे आयुष्य फक्त चरित्र म्हणून ओळखले जाऊ नयेत, तर खर्या् अर्थाने त्यांच्या ‘कालजयी’ विचारांचा पुरस्कार व्हावा आणि त्यांचे चरित्रपट हे विचारपट म्हणून स्वीकारावेत म्हणून ‘कालजयी सावरकर’ हा लघुपट निर्माण करण्यात आला आहे. ‘विवेक समूह’ गेली अनेक वर्षे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. त्यात अतिशय तेजस्वी आणि अभिमानस्पद पाऊल म्हणजे, ‘दुर्दम्य लोकमान्य’ हे प्रथम पुष्प आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘कालजयी सावरकर’ हे द्वितीय पुष्प.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

पाकिस्तानात भीषण अन्नटंचाई! १.१ कोटी जनतेवर उपासमारीची वेळ, संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याची घंटा

(11 million stare at starvation in Pakistan) पाकिस्तानातील १.१ कोटी जनता तीव्र अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत, त्यापैकी अनेक जण उपासमारीच्या थेट उंबरठ्यावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (FAO) शुक्रवार, दि. १६ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक अन्न संकट २०२५’ या अहवालातून ही धोकादायक स्थिती समोर आली आहे. या अहवालातून पाकिस्तानमध्ये विशेषतः बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या संघर्षग्रस्त आणि उपेक्षित भागांमध्ये अन्नटंचाईची भीषण परिस्थिती ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे...

पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121