स्वावलंबी भारत अभियान

स्वयंरोजगाराकरिता तरुणांचे आशास्थान

    11-Jan-2023
Total Views | 88

स्वावलंबी भारत अभियान

 
‘राष्ट्रभक्ती ले हृदय में, हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह, राष्ट्र विजयी हो हमारा’ या संघगीताच्या पंक्तींप्रमाणे अत्यंत विचारपूर्वक स्वावलंबी भारत अभियानाचा विचार झाला. योजना आखली गेली व अभियानाला आवश्यक एवढेच संघटन तयार करून स्वामी विवेकानंद जयंती दिनी अर्थात युवा दिवस दि. 12 जानेवारी 2022 ला अभियानाला सुरुवात झाली. संघविचार प्रवाहाची 15 संघटना व अन्य काही धोरणात्मक सहयोगाने जोडलेल्या कंपन्या मिळून हे अभियान पुढे घेऊन जाण्याचा निर्णय झाला.
रोना काळात अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या, उद्योग धंदे मंदावले, उत्पादन क्षेत्रांची वाताहत झाली, अनेक देश निराशेच्या गर्तेत गेले, भारतात ही प्रचंड लोकसंख्येमुळे खूप क्लेशकारक कालखंड होता. देशाच्या नेतृत्वाने अत्यंत संयमित भूमिका घेत, धीरोदात्तपणे, समस्येच्या मुळालाच हात घालत ती गुंतागुंत सोडवली. अर्थव्यवस्थेला मार्गी लावण्यासाठी मे 2020 मध्ये 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज घोषित करून त्याचे क्रियांवयन केले. निराशेच्या वातावरणात आशेचे किरण नजरेस पडू लागले. याच आयामातून ‘स्वावलंबी भारत अभियाना’ने समाजासाठी आर्थिक रोजगारासंदर्भातले महत्त्वाचे पाऊल टाकले. आव्हान किती मोठे, दूरगामी परिणाम करणारे आहे, देशाच्या एकूण ‘सोशल फॅब्रिक’ला बाधित व अस्वस्थ करणारे आहे याचा अंदाज घेतला गेला. ‘ हा स्पेशल पर्पज वेहिकल’ अर्थात विशेष प्रयत्नशील अभियानाने या हतबल झालेल्या अर्थव्यवस्थेला आधार व आत्मविश्वास मिळवून देण्याकरिता देशभरातल्या एकूण 750च्या संख्येने असलेल्या जिल्ह्यातील 600 जिल्ह्यापर्यंत आपला हा आवाज ’उद्यमिता प्रोत्साहन संमेलना’च्या माध्यमातून पोहोचवला. सुमारे चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत अभियानाचे कार्यकर्ते पोहचले. अनेक नवउद्योजकांचे सन्मान यानिमित्ताने झालेत. ज्या उद्योजकांनी कोरोनाच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांना अखंड पगार दिला, त्यांची विविध मार्गाने मदत केली, अशा सर्व उद्योजकांचाही सत्कार केला गेला. देशभर एक सकारात्मक ऊर्जा संचारित झाली.


आजच्या घडीला भारतात अंदाजे 55 कोटींचा ‘वर्क फोर्स’ (कार्यक्षम मनुष्यबळ) आहे. सरकारी, निमसरकारी, खासगी व ज्यांना ‘ऑर्गेनाईज सेक्टर’ म्हणतात ते सर्व मिळून चार कोटी लोकांना नोकर्‍या देऊ शकतात. ‘एमएसएमई’ सेक्टरच्या अंदाजे सहा कोटींच्या वर ’रजिस्टर’ संस्थांमधील कर्मचारी, ‘एन्शिलरी युनिट्स’ व त्यांचे कर्मचारी धरले, तर तो आकडा काही कोटींमध्ये असला, तरीही ‘वर्क फोर्स’ व उपलब्धता यात बरीच तफावत आहे. दरवर्षी वाढणार्‍या लोकसंख्येकडे पाहिले, तर येणार्‍या काही वर्षात भारत जगातील सर्वात अधिक जनसंख्येच्या यादीत पहिला क्रमांक गाठणार आहे. देशातील प्राकृतिक संसाधने सीमित आहेत व गरजा तुलनेने अधिक आहेत. शिवाय सामाजिक , सांस्कृतिक व शासकीय स्तरावर पाश्चिमात्य जीवन शैलीचा वाढता प्रभाव या प्राकृतिक संपदेला विनाशाकडे ढकलत आहे. ‘ऑटोमेशन’च्या वाढत्या प्रभावामुळे नोकर्‍या दिवसेंदिवस कमी होत जाणार आहेत. येणार्‍या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानात कौशल्य असणार्‍या व्यक्तींची वर्णी नोकरीकरिता लागणार आहे. तरुण-तरुणींनी ‘स्कील्स’ वाढवण्याची गरज भासणार आहे. द्रोण, फाईव्हजी, इंधनाच्या वाढत्या किमती, बर्‍याच क्षेत्रातील नोकर्‍या गिळंकृत करणार आहेत. नोकर्‍यांसंबंधी एक स्वतंत्र लेखमाला लिहिता येईल, एवढे साहित्य आज उपलब्ध आहे. मोठे संकट आपल्यासमोर उभे आहे. या सगळ्या बाबींचा आढावा घेत कांदिवली पश्चिमेला ‘आधारिका सामाजिक संस्थे’च्या वास्तूमध्ये रोजगारसृजन केंद्र उभारले गेले.



रोजगारसृजन केंद्र : एक महत्त्वाचा टप्पा


अभियान सुरू करताना तीन प्रमुख उद्देश निश्चित केले गेले -
1) भारतातील गरिबी समूळ नष्ट करणे.
2) देशातील प्रत्येक कार्यक्षम व्यक्तीला रोजगारयुक्त करणे.
3) भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करणे.


या अभियानाला पुढे घेऊन जाण्याचे चार मार्ग अवलंबिले आहेत.


1) उद्योजकता
2) स्वरोजगार
3) सहकारिता
4) विकेंद्रीकरण

या अभियानाचे त्रिकरणीय पैलू आहेत.


1) नोकर्‍या
2) स्वरोजगार
3) उद्योजकतेचा विकास

या आधी झालेल्या उल्लेखानुसार नोकरी व त्याची मर्यादा स्पष्ट झाली आहे. तरुण-तरुणींनी स्वरोजगारांकडे वळणे काळाची गरज आहे. ज्या उद्योजकांनी साहसी वृत्ती दाखवत उद्योग-धंदे सुरू केले आहेत, त्यांना आधार देण्याची गरज आहे. उद्योगांना लागणारी पाच पायाभूत गरजांची अर्थात 5 5 M (Man, Machine, Money, Marketing, Management) ची गरज भागविणे, हा उद्देश आहे. तरुणांकरिता अत्यंत प्रेरक या विचारांवर हे अभियान व त्याचे वैचारिक अधिष्ठान आधारित आहे...
 
 
1) Start Earning Early, Earn while you Learn
2) Be job provider, not job seeker
3) Be passionate, be risk taker, be innovative, be techno savy
4) Think big, Think new, Think out of box
5) Nation first, Swadeshi must
ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी बंधुंकरिता भारतीय किसान संघ अहोरात्र कार्यरत आहे. अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गावोगावी ‘एफपीओ’ स्थापित करणे , सरकारच्या शेतकर्‍यांकरिता असलेल्या विविध योजना राबविण्याचे कार्यही विपुल प्रमाणात सुरू झाले आहे. भारतीय मजदूर संघ ऑर्गनाईज्ड व असंघटित क्षेत्रातील कामगारांना या अभियानात जोडून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिताच विशेषतः सुरू झालेले हे अभियान विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करीत आहे. ‘स्टार्टअप्स ’, ‘स्टेंडअप योजनें’तर्गत तरुण उद्योजकांना नेमकी माहिती, मार्गदर्शन व साहाय्य मिळेल, असेही प्रयत्न सविष्कार या आयामात सुरू आहेत. अनेक सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, तसेच मोठे कॉर्पोरेट या प्रयत्नांत आपली समिधा समर्पित करायला पुढे येत आहेत. ‘झोहो कॉर्पोरेशन’, ’सपिओ अ‍ॅनालिटीक्स’, ‘वकरांगी’, ’पर्सिस्टेंट सिस्टीम’, ‘चोयल इन्स्टिट्यूट’ यांसारख्या काही ‘प्रोफेशनल कंपन्या’ या अभियानात जोडल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने mysba.co.in या अभियानाच्या पोर्टलला Sapio analytics H$adr technology partner बनविले आहे.


 या पोर्टलवर ज्यांना नोकरी हवी आहे, अशा इच्छुकांना तसेच उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहणार्‍यांना भरपूर माहिती उपलब्ध आहे. आजच्या तरुण पिढीकरिता, ज्या मंडळींना आपले योगदान द्यायचे आहे, त्यांनी स्वतः ला ‘डिजिटल वोलंटर(व्हॉलेंटिअर) म्हणून ‘रजिस्टर’ करून घ्यायचे आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी तयार केलेले ‘डीपीआर’ ( Detail Project Report) ही उपलब्ध आहेत. विविध प्रकारे हे अभियान सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वसमावेशक व्हावे, या दृष्टीने अनेक आवश्यक बिंदू ध्यानात घेतले आहेत.


 
या सर्व बिंदूंचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्ला रोजगारसृजन केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला आहे व ते केंद्र प्रस्थापित करण्याचे प्रयत्न देशभर सुरू झाले आहेत. या प्रयत्नांचा एक आविष्कार म्हणजे कांदिवलीतील महावीर नगर येथील रोजगारसृजन केंद्र. मुंबई उपनगर या शासकीय जिल्ह्यात जनसंख्या व आवश्यकता लक्षात घेऊन हे दुसरे केंद्र सुरू झाले आहे. ‘आधारिका भवना’तल्या केंद्रात प्रशिक्षित झालेल्या महिलांपैकी एकीने स्वतःचे ‘ब्युटी पार्लर’ काढले आहे. एक अन्य महिलेने मोटरड्रायव्हिंगचे सेंटर सुरू केले आहे. येथील एका महिलेने तर स्वतःचे ‘बुटिक’ही सुरू केले आहे. पोळी-भाजी केंद्र, दिवाळी व अन्य सणासुदीला फराळ निर्मिती व विक्री विपुल प्रमाणात सुरू आहे. शिलाई प्रशिक्षण करणार्‍या अनेक महिला येथून प्रेरणा घेऊन व्यवसाय करीत आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मितीच्या विविध योजना येथे राबविल्या जातात. नजीकच्या भविष्यात ‘नेल आर्ट’चे प्रशिक्षण व सहा महिने ‘ऑनजॉब ट्रेनिंग’ सुरू होत आहे. ‘सहकार भारती’च्या साहाय्याने अंदाजे 350 वस्तूंचे ‘प्रॉडक्शन’ प्रशिक्षण वर्ग येथे सुरू होणार आहेत. उद्योजकांना ‘बँकिंग’, ‘फायनान्स’, ‘इन्शुअरन्स’, ‘टेक्नोलॉजी’चे प्रशिक्षण तसेच सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था असेल. फक्त आर्थिक मदत नाही, तर उद्योजकांना हवे असणारे कौन्सिलिंग (समुपदेशन), मोटिव्हेशन (प्रेरक) , स्किल डेव्हलपमेंट च्या प्रशिक्षणाची ही सोय करण्यात येईल.



यापूर्वी सुरेश देवळे यांच्या पुढाकाराने पहिले केंद्र दहिसर पश्चिम येथील नवागाव स्थित समाज कल्याण मंदिरात सुरू झाले आहे. सर्वात आधी दि. 14 एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला धारावीत असे केंद्र सुरू झाले होतेच. आता नजीकच्या काळात मुलुंड व परळ ला ही असेच केंद्र सुरू होणार आहेत. विविध स्तरावरील रोजगार मेळावे घेणे, स्वरोजगाराकरिता शिबीर भरविणे, तसेच सरकारच्या शक्य त्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी माहिती वर्ग भरविणे, युवकांच्या कौशल्यवृद्धीकरिता अभ्यास वर्ग भरविणे, अनेक लहान-मोठ्या वस्तू, पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, उद्योजकांना कौन्सिलिंग , मोटिव्हेशनल सेवा देणे, बँकांच्या मदतीने कर्ज मेळावे भरविणे, ‘कॉर्पोरेट’ जगताशी सुसंवाद स्थापित करणे , धोरणात्मक आवश्यक सूचना सरकार पर्यंत पोहोचविणे हे काही प्रयत्न या रोजगार केंद्राच्या माध्यमातून करणे अपेक्षित आहे. आठ ते दहा कार्यकर्त्यांची एक टीम हे केंद्र चालवतील.


कांदिवली येथील हे ‘आधारिका भवना’तील केंद्र रूची माने यांच्या नेतृत्वात या आधीही अनेक महिलांचे आधारस्तंभ होतेच. 200च्या वर महिला बचतगटाच्या माध्यमातून शिलाई, ब्युटीपार्लर , मोटर ड्रायव्हिंग इ. च्या प्रशिक्षणाचे कार्य येथे सुरू होते. या केंद्रातून आत्ता पर्यंत 500च्या वर महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. रोजगार सृजन केंद्र सुरू झाल्याने त्या कार्याला अधिक गती येईल, यात शंकाच नाही. देशाची अर्थव्यवस्था पुष्ट होणे जितके आवश्यक आहे. तेवढीच स्वस्थ असणे ही आवश्यक आहे. रोजगार युक्त गरिबीमुक्त प्रगतिशील समाज निर्माण करणे, ही काळाची गरज आहे व त्यातून समर्थ, वैभवसंपन्न, शक्तिसंपन्न भारत होण्याचा राजमार्ग दिसत आहे.






अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121