डॉक्टरांच्या चुकीमुळे ४६ रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह

    07-Feb-2018
Total Views | 17

 
 
 
उत्तरप्रदेश : येथे एका डॉक्टरच्या चुकीमुळे ४६ रुग्णांना एचआयव्हीची लागवण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वस्तात उपचार करुन घेणे काही लोकांना चांगलेच महागात पडले आहे. डॉक्टरच्या अक्षम्य चुकीने एकाच वेळी ४६ लोकांनी एचआयव्हीची लागण झाली आहे. उपचारादरम्यान सर्व रुग्णांसाठी एकाच सुईचा वापर केल्याने ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊमधील या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
 
 
सुईचे पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईने अनेकांना इंजेक्शन देण्यात आले होते. २४,२५ आणि २७ जानेवारी २०१७ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात जवळच्या गावातील राजेंद्र कुमार याने पैसे वाचवण्यासाठी एकाच सुईचा वापर केला. त्यामुळे इतके लोक एचआयव्ही बाधित झाले आहेत. अशी माहिती समोर येत आहे. आरोग्य शिबिरांमुळे अशी एड्सची प्रकरणे समोर आली आहेत. या घटनेतील दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी दिले आहे.
 
राजेंद्र कुमार असे या डॉक्टरचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल ते जुलै महिन्यात केवळ बांगरमऊ गावात १२ लोक एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. बांगरमऊच्या गावांमध्ये एका एनजीओने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी तपासात काही लोकांमध्ये एचआयव्हीची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे देखील या सर्व रुग्णांना एचआयव्ही झाला असल्याचे स्पष्ट झाले. "हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने चौकशीसाठी २ सदस्यीय समित्यांची स्थापना केली आहे. या घटनेतील पीडितांना एआरटी सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे." अशी माहिती चीफ मेडिकल ऑफीसर डॉ. एसपी चौधरी यांनी दिली.
अग्रलेख
जरुर वाचा
गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

गंगापूर धरणातील विसर्गात घट१ हजार ७६० क्युसेकने विसर्ग घटविला

मागील तीन ते चार दिवसांपासून गोदावरी नदीला आलेला पूर काही अंशी ओसरणार असून गंगापूर धरणातून सुरुअसलेला विसर्ग घटविला जाणार आहे. सध्या ६ हजार १६० क्युसेकने सुरु असलेला विसर्गमंगळवार दि. २४ जून रोजी दुपारी २ वाजता १ हजार ७६० क्युसेकने कमी करण्यात आलाअसून ४ हजार ४०० क्युसेक इतका सुरु राहील, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. मागीलसहा ते सात दिवसांपासून पाणलोट क्षेत्र, घाटमाथा आणि जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुअसल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहायला लागले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच २४धरणांमधील जलसाठ्यात चांगलीच वाढ ..

धारावी पुनर्विकास हा आमचा सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प

धारावी पुनर्विकास हा आमचा सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे सूतोवाच ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला केले संबोधित धारावीच्या विद्यमान वैशिष्ट्यांवर आधारित बांधकाम करण्याचा, धारावीकरांसाठी जागतिक दर्जाचा जिल्हा निर्माण करण्याचा आणि हार्ट ऑफ न्यू मुंबई ठरणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा आमच्यासाठी सर्वात परिवर्तनकारी प्रकल्प असल्याचे सूतोवाच केले. धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) हा धारावीकरांच्या जीवनमानात आणि 'रोजगाराच्या' विद्यमान परिस्थितीत बदल घडवून..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121