हिंदी विरोधी स्टॅलिन सरकारवर पवन कल्याणचा हल्लाबोल

    15-Mar-2025
Total Views | 14

Pawan Kalyan Comment on Stalin Government

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pawan Kalyan Comment on Stalin) 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला विरोध आणि हिंदी लादल्याचा आरोप गेले काही दिवस तामिळनाडूच्या नेत्यांकडून होतो आहे. यावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी तामिळनाडूच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. या प्रकाराला ढोंगीपणा म्हणत एकीकडे हिंदीला विरोध आणि दुसरीकडे हिंदीत डबिंग करून नफा कमवण्याचे धंदे कशाला, असा थेट सवाल त्यांनी केला आहे.

हे वाचलंत का? : होळीला धर्मांधांचे गालबोट; बंगालमध्ये कट्टरपंथींचा हिंदूंवर हल्ला!

पवन कल्याण म्हणाले की, तमिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात, पण आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तामिळ चित्रपट हिंदीत डब करू देतात. त्यांना बॉलीवूडकडून पैसे हवे आहेत, पण हिंदी स्वीकारण्यास नेत्यांचा नकार आहे. भारताला तामिळसह अनेक भाषांची गरज आहे, फक्त दोन भाषांची नाही. आपण भाषिक विविधता स्वीकारली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाची एकात्मता तर टिकेलच, पण आपल्या लोकांमध्ये प्रेम आणि सौहार्दही वाढेल.

केंद्र सरकार एनईपीच्या त्रि-भाषा सूत्राद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केला होता. एनईपी हे भारताच्या विकासाऐवजी हिंदीला प्रोत्साहन देणारे ‘भगवा धोरण’ असल्याचे म्हटले होते. स्टॅलिन यांच्या भूमिकेवर पवन कल्याण यांनी सणसणीत उत्तर दिल्याचे दिसते आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121