दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्ली सचिवालय कुलूपबंद
08-Feb-2025
Total Views | 15
नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly election) निकालानंतर दिल्ली सरकारच्या प्रशासन विभागाने सुरक्षेचे कारण देत दिल्ली सचिवालय कुलूप बंद करण्यात आले. राजधानीत भाजपच विजय स्पष्ट झाला. आपच्या बड्या नेत्यांना परभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यावेळी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आलेल्या नोटीशीत म्हटले की, प्रशासकीय विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही फाइल्स, कागदपत्रे किंवा संगणक हर्डवेअर सचिवालयाच्या आवारातून बाहेर नेण्याची परवानगी नाही. हा आदेश जारी करताना संयुक्त सचिव प्रदीप तायल यांनी या प्रकरणी सांगितले की, सरकारी कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
या संबंधित आदेशामध्ये असेही सांगण्यात आले होते की, सर्व शाखा प्रभारींना त्यांच्या विभांतर्गत नोंदी आणि फाईल्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात याव्यात. हा आदेश केवळ सचिवालय कार्यालयांनाच लागू नसून मंत्रिपरिषदेच्या शिबिर कार्यालयांनाही लागू होईल, असेही संबंधित नोटीशीत नोंदवण्यात आले आहे.
एकीकडे दिल्ली सरकारकडून सचिवालय कुलूपबंद करण्यामागे सुरक्षेची चिंता वर्तवण्यात आल्याचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अधिकाऱ्यांना ताबडतोब सचिवालयात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले. ज्यामुळे जेणेकरून ते सरकारी कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षा सुनिश्चित करु शकतील. अशा परिस्थितीत गेल्या १० वर्षात झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या फायली वेळीच लपवता याव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला की काय, असा अंदाज सोशल मीडियावर लावण्यात आला आहे.