धर्म रक्षा निधी : कर्तव्य पालनाची एक सुवर्णसंधी!

    24-Feb-2025
Total Views | 72

VHP Dharma Raksha Nidhi Sankalan Abhiyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dharma Raksha Nidhi Sankalan)
विश्व हिन्दू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता 'समाज ऋण' या निस्वार्थी भावनेतून समाज हितासाठी कटिबध्द आहे. आपल्या मातृभूमीशी एकनिष्ठ राहून तिचे संरक्षण करणे आणि तिच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदविणे हे ही या देशातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या उद्देशाने विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतच्या वतीने सध्या धर्मनिधी संकलनाचे कार्य जोमाने सुरू आहे.

विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत उपाध्यक्षा प्रिया सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदूत्व आबाधित रहण्यासाठी विश्व हिंदू परिषद गेली साठ वर्ष सातत्याने कार्यरत आहे. गेल्या ६० वर्षांत, परिषदेने हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदू संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. हिंदू समाजाच्या रक्षणासाठी विहिंपच्या शाखा देशातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. परिषदेने ४ लाखांहून अधिक धर्मांतरित लोकांना त्यांच्या स्वतःच्या धर्मात परत आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. परिषदेचे कार्यकर्ते ९७,००० सेवा केंद्रांद्वारे समाजातील दुर्बल, दुर्लक्षित आणि आदिवासी बांधवांची सेवा करत आहेत.

हे वाचलंत का? : भारताचा विजयोत्सव साजरा करणाऱ्यांवर दगडफेक; ७ जणांना ठोकल्या बेड्या!

जगातील १२५ देशांमधील हिंदू समुदायाशी संपर्क राखण्याचे मोठे काम ही परिषद करत आहे. देशभरात आजवर ४०० गोशाळांचे बांधकाम, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, कर्करोगाच्या रुग्णांसाठी रुग्णसेवा सदन आणि शेकडो संस्कार केंद्रे, नैतिक शिक्षण केंद्रे, शिवणकाम केंद्रे, संगणक केंद्रे सक्रिय आहेत. देशभरातील युवतींना लव्ह जिहादपासून वाचवून त्यांना त्यांच्या धर्मात परत आणण्यासाठी परिषदेचा युवा विभाग बजरंग दल आणि युवा विभाग दुर्गा वाहिनी अथक प्रयत्न करत आहेत. आजतागायत ६२ लाखाहून अधिक धर्मांतरण थांबविण्यात विहिंप यशस्वी ठरली आहे, तसेच आत्तपर्यंत ९ लाखांहून अधिक लोकांची "घरवापसी" म्हणजे जे लोक वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून अथवा जोरजबरदस्तीने धर्मांतरित होण्याऱ्या आणि मग नंतर परधर्मी यांची कपट उद्दिष्टे लक्षात आल्यावर परत आपल्या धर्माकडे धाव घेणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठीचे विहिंपचे कार्य उल्लेखनीय आहे. धर्मांतरणमुक्त भारत या उद्दिष्टपूर्ती साठी सर्व समाजाचा सहयोग आणि सहकार्य अपेक्षित आहे.

कोणतीही संस्था पुढे नेण्यासाठी मनुष्यबळासह पैसाही लागतो. धर्म रक्षणासाठी विश्व हिन्दू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या निष्ठेने समर्पित भावनेने काम करत असताना आर्थिक पाठबळाचीही तेव्हढीच गरज भासते. त्यामुळे वर्षातून एकदा धर्मरक्षा निधीमध्ये योगदान देण्याचे जाहीर आवाहन विहिंप कडून केले जाते. जेणेकरून एकत्रित निधी संकलन करून वेगवेगळ्या हिन्दू जनहिताच्या कार्यांकरिता आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. संपूर्ण देशवासीही यात नेहमीच आपला सहयोग देत असतात. १००० पासून ते दहा लाखापर्यंत आपापल्या क्षमतेनुसार समाजातील अनेक सुजाण नागरिक आणि व्यापारी वर्ग सढळ हाताने मदत करत असतो.

देश बांधवांच्या मदतीने देश बांधवांच्या मदतीकरिता हा निधी सुयोग्य नियोजन पद्धतीने हिन्दू जनहितासाठी वापरला जातो. धर्म रक्षकांच्या खडतर प्रयत्नामुळे जरी आज भारतीय धर्म संस्कृतीकडे परप्रांतीय आदराने पाहत असले तरी हिन्दू समाज आपल्या अस्तित्वासाठी अजूनही संघर्ष लढतोय हेही तितकेच खरे आहे. हिन्दू समाजापुढे अजूनही बरीच आव्हाने आहेत. संस्कारक्षम भावी पिढी निर्माण होण्यासाठी धर्म टिकवणे हे प्रत्येक हिंदूची नुसती गरज नसून आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे या उपक्रमात समाज्याच्या प्रत्येक वर्गाचा सहभाग अपेक्षित आहे. आपल्या राष्ट्राला गौरवशाली बनवण्यासाठी, स्व-जागरूकता, कौटुंबिक ज्ञान, सामाजिक सौहार्द, पर्यावरण आणि नागरी कर्तव्य हे पंच परिवर्तनाचे विषय भारतातील प्रत्येक कुटुंबास वैयक्तिक जीवनात आणि आचरणात समाविष्ट करून घेण्यास विहिंप प्रेरित करण्याचे व त्यायोगे समाज उन्नती साधण्याचे महत्त्वाचे कार्य विहिंप करत आहे. विश्वकल्याण्याचा उदात्त विचारावर आधारित हिंदू जीवनशैली आपण सर्वांनी आपल्या जीवनात समाविष्ट केलीच पाहिजे. रामराज्य संस्थापित करण्याच्या राम कार्यात आपला सहभाग असल्याचे समाधान प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्तीला मिळावे हा "धर्म रक्षा निधी" संकलन उपक्रमाचा जनमानसास प्रदीप्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : प्रिया सावंत - ९९९०६९०३५३

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121