सैफ अली खानवर हल्ला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

    16-Jan-2025
Total Views | 152
 
Fadanvis
 
मुंबई : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरुवार, १६ जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याबाबत पोलिसांनी आपल्याला सगळी माहिती दिली आहे. या हल्ल्यामागे कोणता हेतू असू शकतो आणि ते कुठून आले? हेसुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यावर पूर्ण कारवाई सुरु आहे."
 
हे वाचलंत का? -  आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील एक काळी रात्र!
 
मुंबई सर्वात सुरक्षित शहर!
 
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. कधी कधी काही घटना घडतात, हे खरं आहे. त्यांना गंभीरतेनेदेखील घेतले पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिले पाहिजे यादृष्टीने सरकार निश्चित प्रयत्न करेल."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121