“राज ठाकरेंवर टाडा लावून त्याला कारागृहात टाकले पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप!

    05-Aug-2024
Total Views | 108
 
Ambedkar & Thackeray
 
अमरावती : राज ठाकरेंवर टाडा लावून कारागृहात टाकले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशा लोकांना सरळ आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूससुद्धा युपीमध्ये आहे, ओडीसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही आहे. त्यांचं काय करायचं? त्यामुळे समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत. समाज दुभंगला की, देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "आम्ही सुरु केलेल्या आरक्षण बचाव यात्रेला प्रचंड यश मिळालं आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं विधान केलं. आज मी खात्रीलायक एक विधान करु शकतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. यातून एक मराठा समाजाचा आणि दुसरा ओबीसींचा असे दोन गट पडले आहेत. राजकीय भांडणं सामाजिक भांडणात परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेमुळे उध्वस्त झाले आहेत," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121