महाराष्ट्राचा नावलौकिक सांभाळत देशात नंबर एकचे राज्य बनवू : अजित पवार

    04-Dec-2024
Total Views | 47
 
Mahayuti
 
मुंबई : आम्ही सगळे महाराष्ट्राचा नावलौकिक सांभाळत देशात नंबर एकचे राज्य बनवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मिळून सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
अजित पवार म्हणाले की, "आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करू. राज्यातील सर्व घटकांना आमच्या अनुभवाचा फायदा कसा करता येईल, यासाठी काम करू. तसेच निवडणूकीच्या काळात दिलेली सर्व आश्वासनांची पुर्तता करू. देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा एका वेगळा नावलौकिक आहे. हा नावलौकिक सांभाळत नंबर एकचे राज्य म्हणून असलेली ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करू," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ!
 
मी दिल्लीत कुणालाही भेटायला गेलो नाही!
 
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती. यावरही त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, "मी माझ्या वेगळ्या कामाकरीता दिल्लीला गेलो होतो. कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. परंतू, माध्यमांनी मस्त दादांना भेट नाकारल्याच्या बातम्या लावल्या. पण मी भेटायला गेलोच नव्हतो तर भेट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही."
 
"या सर्वांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेचे सभासद केले आहे. त्यांना ११ जनपथ हा बंगला मिळाला आहे. मला कुठलेही घर नीटनेटके लागते. त्यामुळे मी तिथे आर्किटेक्टला घेऊन नियमांमध्ये राहून काय बदल करता येईल, हे बघण्यासाठी गेलो होतो. आमच्या केस प्रकरणी मी वकिलांना भेटलो. तसेच एका जवळच्या व्यक्तीचे लग्न होते. या तीन गोष्टींसाठी मी दिल्लीला गेलो होतो," असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121