मेट्रो ३साठी १०० टक्के ट्रॅक उभारणी पूर्ण

आरे ते कफ परेड ट्रॅकचे १०० टक्के काम पूर्ण

    11-Dec-2024
Total Views | 27

metro 3


मुंबई, दि.११ : 
मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. हे पाहता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे ते कफ परेड पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण केले आहे, ज्यामध्ये अप आणि डाउन दोन्ही मार्गांचा समावेश आहे. हे काम म्हणजे पूर्ण मार्गिका कार्यान्वित होण्याच्या दिशेने प्रकल्पाच्या प्रगतीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, अशी माहिती एमएमआरसीने ट्विट करून दिली आहे.

मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत दुसरा टप्पा मे २०२५ पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था आणखी सुधारेल. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे कॉलनी ते बीकेसी ला जोडणारा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर रोजी कार्यान्वित केला. पहिल्या दिवशी सकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत २०,४८२ प्रवाशांनी मेट्रो सुविधांचा लाभ घेतला. व्यावसायिक कामकाजाच्या पहिल्या रविवारी २७,१०८ प्रवाशांनी प्रवास केला, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. पहिल्या महिन्यात ६,००,०००पेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवास केला आहे. या मार्गावरून दररोज सरासरी २०,०००हून अधिक लोक प्रवास करत आहेत.

नवीन पादचारी क्रॉसिंग

प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेऊन आरे-जेव्हीएलआर स्थानकावर नवीन पादचारी क्रॉसिंग सुरू करण्यात आले आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर ब्लिंकर सिग्नल, कॅट आय आणि रंबलर स्ट्रिप्स देखील बसवण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो एक्वा लाइन ३च्या प्रगतीमुळे मुंबईकरांच्या जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाच्या शक्यतांना बळ मिळाले आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण अंमलबजावणीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

परफॉर्मन्स रिपोर्ट

एकूण रायडरशिप: 11,97,522

नियोजित फेऱ्यांची संख्या: 13,504

वास्तविक फेऱ्या: 13,480

सरासरी वक्तशीरपणा: 99.61%

विलंब : ०.३७% (५१)

ट्रिप रद्द: 0.17% (24)
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121