बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 'वनार्टी'ची स्थापना

    01-Oct-2024
Total Views | 63

banjara
 
 
मुंबई : सर्वांगीण विकासापासून कोसो दूर असलेल्या बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर 'वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था' (वनार्टी) स्थापन करण्याचा निर्णय सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या समाजघटकातील विद्यार्थी, युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, न्यायव्यवस्था, सीए, सीएस, कायदा, यूजीसी, नेट आणि सेट तसेच कॅट, नीट, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांच्यासह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विविध टप्प्यांवर प्रशिक्षण घेणे, विविध लष्करी, पॅरामिलिटरी सर्विसेस परीक्षांसाठी प्रशिक्षण, लक्ष गटांच्या उमेदवारांना प्रशिक्षण, विविध उद्योग आणि संस्थांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी उमेदवारांना प्रशिक्षण, परीक्षांची चाचणी मालिका, व्यक्तिमत्व विकास चाचणी, मुलाखती, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या यासाठी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करणे, एचएससी, एसएससी आणि पदवीधर तसेच उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभियोग्यता वादाविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच लक्ष गटांच्या विविध समुदायांच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासावरील संशोधना संबंधी माहितीचे संकलन आणि प्रसार करण्यासाठी तसेच विविध उपक्रम, प्रकल्प कार्यक्रम, योजना इत्यादी स्वतःहून किंवा सरकारी, निमशासकीय संस्था, खासगी संस्था इत्यादींच्या सहकार्याने ‘वनार्टी’ उपक्रम राबवणार आहे.
 

अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121